शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

कोरोना लसीकरणात महिला पुरुषांपेक्षा मागेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोली जिल्ह्यात १८ वर्षांपासून पुढील लोकसंख्या जवळपास १० लाखांच्या घरात जाणारी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. यामध्ये ...

हिंगोली जिल्ह्यात १८ वर्षांपासून पुढील लोकसंख्या जवळपास १० लाखांच्या घरात जाणारी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातच चार ते साडेचार लाख लोकसंख्या असून सध्या त्यांनाच लसीकरणाला परवानगी नाही;मात्र उर्वरित लोकसंख्या ही ५० टक्के आहे. त्यांनाच अधिक धोका असल्याने त्यांनी लसीकरण करून घेणे जास्त गरजेचे आहे. यासाठी वारंवार जनजागृती करण्यात येत आहे; मात्र तरीही त्याला प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागातील जनता सध्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे. तर शहरी भागात मात्र जनता सुज्ञ असूनही वेगवेगळ्या अफवांना बळी पडत असल्याचे दिसत आहे. त्यातच मागील आठ दिवसांत नाणे अंगाला चिटकण्याचे एक-दोन प्रकार समोर आले आणि उरला-सुरला उत्साहही संपल्याचे दिसत आहे. दुसरीकडे तीन व्हायलही संपत नसल्याने लसीचे डोस तसेच पडून राहण्यापेक्षा तरुणांना लस देण्याची वेळ या केंद्रांवर येत आहे. काही केंद्रांवर तर नंतर हे व्हायल वायाच जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा कहर संपला असे न समजता लसीकरण करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

ही लस घेतल्यावर ताप येते, अशक्तपणा येतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे लस घेण्याची भीती वाटत आहे;मात्र ती लवकरच घेणार आहे.

-केशव घनतोडे, केंद्रा बु.

आता शेताची कामे सुरू आहेत. ताप आला तर कामे बुडतील म्हणून लस घेतली नाही. आधी ही लस मिळत नव्हती म्हणून घेता आली नाही.

-पंचफुलाबाई मुधळकर, मोप

ही लस घेतलेल्यांना नंतर ताप आला. काहीजण आजारी पडले. त्यामुळे ही लस घेण्यासाठी भीती वाटत आहे. त्यामुळे लस घेतली नाही.

-पुण्यरथाबाई पठाडे, कानरखेडा बु.