शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

वळण रस्ते बनले खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच हिंगोली: शहरातील गांधी चौक, महावीर चौक, बसस्थानक परिसर, वाशीम रोड आदी भागात विरुद्ध दिशेने वाहतूक ...

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच

हिंगोली: शहरातील गांधी चौक, महावीर चौक, बसस्थानक परिसर, वाशीम रोड आदी भागात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे.

बसस्थाकात धुळीचे प्रमाण वाढले

हिंगोली: मागील काही दिवसांपासून बसस्थानकात धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बसस्थानकातील धूळ कमी करण्यासाठी बसस्थानक प्रशासनाने साफसफाई करुन सकाळ आणि सायंकाळच्यावेळी बसस्थानकात परिसरात पाणी टाकावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

नाल्यांवर औषध फवारणी करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील जिजामातानगर, गंगानगर, खटकळी परिसर, पेन्शनपुरा आदी भागाधील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागात स्वच्छता मोहीम राबवून नाल्यावर औषध फवारणी करावी, अशी

मागणी होत आहे.

अंतर्गत रस्त्यांची दुरवस्थाहिंगोली: शहरातील नाईकनगर, देवडानगर, रेल्वेस्टेशन परिसर आदी भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची करत करावी लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घेऊन अंतर्गत रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे.

कळमनुरी तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु

कळमनुरी: शहरासह परिसरातील वीजपुरवठा मागील काही दिवसांपासून खंडित होत आहे. काही ठिकाणी तर भारनियमनाव्यतिरिक्त वीज खंडित होत आहे. यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद पडत आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

कळमनुरीत शहात वाहने अस्ताव्यस्त

कळमनुरी: शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. मुख्य रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने कुठेही उभी केली जात आहेत. शहर वाहतूक शखेने याची दखल घेऊन कळमुनरी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शिवारात तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये अतिवृष्टीने सोयाबीन, कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. तूर चांगली येईल, अशी आशा होती. परंतु, तुरीवरही अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.