शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

‘जलेश्वर’ तलावाच्या काठची अतिक्रमणे हटविणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 19:13 IST

शहरातील जलेश्वर तलाव सुशोभीकरण

ठळक मुद्देअस्वच्छ पाणी मंदिरात शिरत असल्याच्या तक्रारी

हिंगोली : जलेश्वर तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत १० फेबु्रवारी रोजी परत एक बैठक पार पडली.  नोटिस बजावूनही अतिक्रमण हटविले जात नसल्याने आता महसूल प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार आहे. याठिकाणी अतिक्रमण केलेल्या जवळपास १९५ घरांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.हिंगोलीतील जलेश्वर तलाव सुशोभिकरणासाठी नगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. परंतु शुशोभिकरणासाठी तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा अडसर येत असून अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नोटिसाही पाठविल्या आहेत. परंतु अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यानंतर अतिक्रमणधारकांसाठी जागा खरेदी करून त्यांना घरकुल योजनेतून लाभ दिला जाईल, असे वेळोवेळी आश्वासनही नगरपालिकेकडून देण्यात आले होते. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा पालिकेने प्रस्तावही पाठविला आहे. परंतु सदर प्रस्ताव थंड बस्त्यातच आहे. मात्र आता महसूल प्रशासनाकडून जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जलद गतिने हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. नुकतीच अतिक्रमण हटविण्याबाबत बैठक पार पडल्याने आता प्रत्यक्षात कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे. तलावाकाठावरील अतिक्रमण हटविले जाणार असल्यामुळे मात्र ‘आम्ही जावे तरी कुठे?’ असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आ. तान्हाजी मुटकुळे आणि नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची भेट घेतली होती. यावेळी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. जलेश्वर तलाव सुशोभिकरणात अतिक्रमणामुळे अडथळा होत असल्याने येथील विकासकामे रखडली आहेत.  हिंगोली येथील जलेश्वर तलावाच्या विकासाकरीता अतिक्रमण हटविणेबाबत महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे याबाबत हिंगोली येथील तहसीलदारांनी १९५ अतिक्रमणधारक कुटुंबांना नोटीस दिली. परंतु अद्याप अतिक्रमण हटले नसल्याने आता महसूल प्रशासन येथील घरांवर बुलडोजर चालविणार आहे. त्यामुळे येथील शेकडो नागरिक बेघर होणार आहेत. नव्यानेही अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली. ही अतिक्रमणेही हटविणे तेवढेच गरजेचे आहे.‘त्या’ ठरावाची चर्चाया अतिक्रमणग्रस्तांना हक्काचे घर मिळावे, यासाठी न.प.ने जागा भूसंपादन करण्याची निविदा मागविली होती. मात्र त्यापेक्षा कमी दरात शहरात जागा मिळू शकते. त्यामुळे या ठरावास विरोध झाला होता. तरीही हाच ठराव पुढे रेटल्याचा आरोप होत असून भविष्यात पुन्हा विरोधाची शक्यता दिसत आहे.बेघर झाल्यावर आम्ही जावे कुठे ? येथील तलावाकाठावर मागील ३० ते ४० वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु प्रशासनाकडून नोटीस पाठविल्याने आम्ही बेघर झाल्यास जावे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमण धारकांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगरपालिकेकडून प्रस्ताव पाठविला आहे. जे जुने अतिक्रमणधारक आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे म्हणाले, जलेश्वर तलावकाठावरील महसूलच्या जागेतील अतिक्रमण लवकरच हटविले जाणार आहे. संबंधितांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यांना नेहमी संधी देण्यात आली होती. मात्र अद्याप स्वत:हून कोणी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे आता नियमानुसार संबंधित यंत्रणेद्वारे लवकरच अतिक्रमण हटविले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमणWaterपाणी