शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

‘जलेश्वर’ तलावाच्या काठची अतिक्रमणे हटविणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 19:13 IST

शहरातील जलेश्वर तलाव सुशोभीकरण

ठळक मुद्देअस्वच्छ पाणी मंदिरात शिरत असल्याच्या तक्रारी

हिंगोली : जलेश्वर तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत १० फेबु्रवारी रोजी परत एक बैठक पार पडली.  नोटिस बजावूनही अतिक्रमण हटविले जात नसल्याने आता महसूल प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार आहे. याठिकाणी अतिक्रमण केलेल्या जवळपास १९५ घरांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.हिंगोलीतील जलेश्वर तलाव सुशोभिकरणासाठी नगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. परंतु शुशोभिकरणासाठी तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा अडसर येत असून अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नोटिसाही पाठविल्या आहेत. परंतु अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यानंतर अतिक्रमणधारकांसाठी जागा खरेदी करून त्यांना घरकुल योजनेतून लाभ दिला जाईल, असे वेळोवेळी आश्वासनही नगरपालिकेकडून देण्यात आले होते. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा पालिकेने प्रस्तावही पाठविला आहे. परंतु सदर प्रस्ताव थंड बस्त्यातच आहे. मात्र आता महसूल प्रशासनाकडून जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जलद गतिने हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. नुकतीच अतिक्रमण हटविण्याबाबत बैठक पार पडल्याने आता प्रत्यक्षात कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे. तलावाकाठावरील अतिक्रमण हटविले जाणार असल्यामुळे मात्र ‘आम्ही जावे तरी कुठे?’ असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आ. तान्हाजी मुटकुळे आणि नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची भेट घेतली होती. यावेळी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. जलेश्वर तलाव सुशोभिकरणात अतिक्रमणामुळे अडथळा होत असल्याने येथील विकासकामे रखडली आहेत.  हिंगोली येथील जलेश्वर तलावाच्या विकासाकरीता अतिक्रमण हटविणेबाबत महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे याबाबत हिंगोली येथील तहसीलदारांनी १९५ अतिक्रमणधारक कुटुंबांना नोटीस दिली. परंतु अद्याप अतिक्रमण हटले नसल्याने आता महसूल प्रशासन येथील घरांवर बुलडोजर चालविणार आहे. त्यामुळे येथील शेकडो नागरिक बेघर होणार आहेत. नव्यानेही अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली. ही अतिक्रमणेही हटविणे तेवढेच गरजेचे आहे.‘त्या’ ठरावाची चर्चाया अतिक्रमणग्रस्तांना हक्काचे घर मिळावे, यासाठी न.प.ने जागा भूसंपादन करण्याची निविदा मागविली होती. मात्र त्यापेक्षा कमी दरात शहरात जागा मिळू शकते. त्यामुळे या ठरावास विरोध झाला होता. तरीही हाच ठराव पुढे रेटल्याचा आरोप होत असून भविष्यात पुन्हा विरोधाची शक्यता दिसत आहे.बेघर झाल्यावर आम्ही जावे कुठे ? येथील तलावाकाठावर मागील ३० ते ४० वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु प्रशासनाकडून नोटीस पाठविल्याने आम्ही बेघर झाल्यास जावे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमण धारकांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगरपालिकेकडून प्रस्ताव पाठविला आहे. जे जुने अतिक्रमणधारक आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे म्हणाले, जलेश्वर तलावकाठावरील महसूलच्या जागेतील अतिक्रमण लवकरच हटविले जाणार आहे. संबंधितांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यांना नेहमी संधी देण्यात आली होती. मात्र अद्याप स्वत:हून कोणी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे आता नियमानुसार संबंधित यंत्रणेद्वारे लवकरच अतिक्रमण हटविले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमणWaterपाणी