शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हिंगोली जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा तिढा यंदा सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 19:53 IST

८0 गावांची या योजनांवर भिस्त

ठळक मुद्देदोन योजनांची कामे सुरू एक पूर्ण, एक निविदेत

हिंगोली : जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांपैकी गाडीबोरी योजनेचे काम पूर्ण झाले असून सिद्धेश्वर व पुरजळचे काम सुरू आहे. तर मोरवाडी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी गेला आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगल्या पर्जन्यामुळे अजूनतरी कुठे टंचाईच्या झळा जाणवत नाहीत. मात्र आता हळूहळू उन्हाचा कडाका वाढत चालला असल्याने टंचाईकडे वाटचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांवर जवळपास ८0 पेक्षा जास्त गावांचा भार असल्याने या योजना सुरू असल्या तरीही एवढ्या गावांचा प्रश्न एका झटक्यात मिटू शकतो. यामध्ये पुरजळ प्रादेशिक योजनेचे काम सुरू आहे. या योजनेखाली औंढा व वसमत तालुक्यातील तब्बल २0 गावे येतात. ही योजना आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसह सौरपंपावर चालणार आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ५.३८ कोटी रुपये मंजूर झाले होते. जलशुद्धीकरण केंद्र व उद्भवाचे काम पूर्ण झाले आहे. पंपिंग मशिनरीचे काम सुरू आहे. नवीन वाहिनीही काही ठिकाणी होत असून पाईप पुरवठा झाला आहे.

सिद्धेश्वर प्रादेशिक योजनेसाठीही ५.३४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती. हे काम जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणार आहे. या योजनेत दुरुस्तीसह, सौरपंप व इतर बाबींचा समावेश आहे. मात्र यातील २६ पैकी १३ गावेच पुनरुज्जीवन योजनेत सहभागी होणार आहेत. ही योजना दुरुस्ती निविदा स्तरात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कळमनुरी तालुक्यातील २५ गावे मोरवाडी प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी १0.११ कोटींचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. अद्याप त्याला मंजुरीच मिळाली नाही. तर ८ गावे गाडीबोरी तिखाडी योजनेत आता ६ गावेच सहभागी राहणार आहेत. उर्वरित दोन गावे यातून वगळली आहेत. या योजनेच्या दुरुस्तीसाठी ४६ लाखांची मंजुरी मिळाली होती. यात जल वाहिनी दुरुस्ती, जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग मशिनरी दुरुस्ती, उंच खांबावरील दोन जलकुंभ आदी कामे करून दुरुस्ती पूर्ण करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मुख्यमंत्री पेयजलमध्येही कामेजिल्ह्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेतीलही काही कामे सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वारंगा फाटा, वसमत तालुक्यातील सोमठाणा, औंढा तालुक्यातील येहळेगाव येथील कामांचा समावेश आहे. यात नांदापूर व वारंगा येथील कामे प्रगतीपथावर आहेत. सोमठाणा येथील काही दिवसांपूर्वीच सुरू झाले. येहळेगाव सोळंके येथील कामही अंतिम टप्प्याकडे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीgovernment schemeसरकारी योजना