शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

हिंगोली जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा तिढा यंदा सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 19:53 IST

८0 गावांची या योजनांवर भिस्त

ठळक मुद्देदोन योजनांची कामे सुरू एक पूर्ण, एक निविदेत

हिंगोली : जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांपैकी गाडीबोरी योजनेचे काम पूर्ण झाले असून सिद्धेश्वर व पुरजळचे काम सुरू आहे. तर मोरवाडी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी गेला आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगल्या पर्जन्यामुळे अजूनतरी कुठे टंचाईच्या झळा जाणवत नाहीत. मात्र आता हळूहळू उन्हाचा कडाका वाढत चालला असल्याने टंचाईकडे वाटचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांवर जवळपास ८0 पेक्षा जास्त गावांचा भार असल्याने या योजना सुरू असल्या तरीही एवढ्या गावांचा प्रश्न एका झटक्यात मिटू शकतो. यामध्ये पुरजळ प्रादेशिक योजनेचे काम सुरू आहे. या योजनेखाली औंढा व वसमत तालुक्यातील तब्बल २0 गावे येतात. ही योजना आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसह सौरपंपावर चालणार आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ५.३८ कोटी रुपये मंजूर झाले होते. जलशुद्धीकरण केंद्र व उद्भवाचे काम पूर्ण झाले आहे. पंपिंग मशिनरीचे काम सुरू आहे. नवीन वाहिनीही काही ठिकाणी होत असून पाईप पुरवठा झाला आहे.

सिद्धेश्वर प्रादेशिक योजनेसाठीही ५.३४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती. हे काम जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणार आहे. या योजनेत दुरुस्तीसह, सौरपंप व इतर बाबींचा समावेश आहे. मात्र यातील २६ पैकी १३ गावेच पुनरुज्जीवन योजनेत सहभागी होणार आहेत. ही योजना दुरुस्ती निविदा स्तरात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कळमनुरी तालुक्यातील २५ गावे मोरवाडी प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी १0.११ कोटींचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. अद्याप त्याला मंजुरीच मिळाली नाही. तर ८ गावे गाडीबोरी तिखाडी योजनेत आता ६ गावेच सहभागी राहणार आहेत. उर्वरित दोन गावे यातून वगळली आहेत. या योजनेच्या दुरुस्तीसाठी ४६ लाखांची मंजुरी मिळाली होती. यात जल वाहिनी दुरुस्ती, जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग मशिनरी दुरुस्ती, उंच खांबावरील दोन जलकुंभ आदी कामे करून दुरुस्ती पूर्ण करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मुख्यमंत्री पेयजलमध्येही कामेजिल्ह्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेतीलही काही कामे सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वारंगा फाटा, वसमत तालुक्यातील सोमठाणा, औंढा तालुक्यातील येहळेगाव येथील कामांचा समावेश आहे. यात नांदापूर व वारंगा येथील कामे प्रगतीपथावर आहेत. सोमठाणा येथील काही दिवसांपूर्वीच सुरू झाले. येहळेगाव सोळंके येथील कामही अंतिम टप्प्याकडे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीgovernment schemeसरकारी योजना