शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

शाळेत आलेले साहित्य पाठविले कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

हिंगोली : जि.प.च्या शाळांना मिळणाऱ्या सादिलवार खर्चातून विशिष्ट साहित्य घेण्याचा आग्रह धरला जात असून, अनेक शाळांवर आलेले हे थेट ...

हिंगोली : जि.प.च्या शाळांना मिळणाऱ्या सादिलवार खर्चातून विशिष्ट साहित्य घेण्याचा आग्रह धरला जात असून, अनेक शाळांवर आलेले हे थेट साहित्य चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षणाधिकारी मात्र आम्ही हे साहित्य पाठविले नसल्याचे सांगत असून, अनेक मुख्याध्यापक याबाबत तोंडी तक्रारी करू लागले आहेत.

सादिलवार खर्चासाठी १५ ते २५ हजारांपर्यंतची रक्कम शाळांना मिळते. यातून त्यांना शालेय कामकाजासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करावे लागते. त्यावरून शाळांमध्येच अनेकदा मोठ्या प्रमाणात वाद होतात. कधी शालेय शिक्षण समिती हिशेब विचारते, तर कधी सहकारी शिक्षकच यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो. हा खर्च होतो किंवा होत नाही, यावरून आधीच एवढ्या संकटांचा सामना करावा लागत असताना, आता नवे संकट आले. शिक्षण विभागाने साहित्य पाठविले, असे सांगून जबरदस्तीने ते शाळेत उतरविले जात आहे. सॅनिटायझर, स्क्रीनिंग मशीन, बकेट आदी प्रकारचे हे साहित्य आहे. बाजारभावापेक्षा त्याच्या किमतीही जास्त आहेत. असे असताना ते घेण्यासाठी मुख्याध्यापकांवर दबावही आणला जात आहे. काही शाळांमध्ये तरीही हे साहित्य नाकारण्याचे धाडस दाखविण्यात आले आहे. आमचा खर्च आधीच झाला असून, याची रक्कम द्यायची कुठून? असा सवाल करण्यात आला आहे.

यामध्ये काही ठिकाणी उठाठेवी करणाऱ्या शिक्षकांना मात्र शिक्षण विभागाचा वचपा काढण्याची संधी मिळाल्याचेच चित्र दिसून येत आहे. ही मंडळी माध्यमांशी संपर्क साधून यावर आगपाखड करताना दिसत आहे. दुसरीकडे मुख्याध्यापक मात्र साहित्य लपवत फिरत आहेत. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, यामागे काही घोटाळा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत विचारले असता, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले, शिक्षण विभागाकडून असे कोणतेच साहित्य पाठविण्यात आले नाही. मुख्याध्यापकांवर दबाव आणण्याचा किंवा तसे काही पत्र देण्याचा विषयच नाही. आमच्याकडे अशी कुणी लेखी तक्रार दिली नाही. सादिलवार रक्कम शाळांनी त्यांना लागणाऱ्या साहित्यावर खर्च करायची असते. शाळांकडून दरवर्षी तो खर्च केला जातो.