शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:54 IST

लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.गुजरात राज्याच्या जबाबदारीमुळे खा.राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे राज्य असल्याने त्यांना पूर्ण वेळ मिळण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र सातव यांच्यानंतर दुसरा कोणी सक्षम उमेदवार समोर आला नाही. इतर अनेकांना विधानसभा निवडणूकच लढवायची आहे. त्यामुळे ऐनवेळी माजी खा.सुभाष वानखेडे यांना आयात करावे लागले. त्यांची निवड करताना लोकसभेत येणाऱ्या आघाडीच्या सर्व आजी-माजी आमदारांना विश्वासात घेतले. एवढेच नव्हे, तर निवडून आणण्याची जबाबदारीही दिली. या सर्व प्रकारांत हिंगोलीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे आघाडीवर होते. तसेच आ.प्रदीप नाईक, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.विजय खडसे यांनाही विचारणा झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक राव चव्हाण, खा.राजीव सातव यांनी वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र आता हिंगोली विधासनभेतच अडचण निर्माण झाली आहे. प्रचारयंत्रणा कामाला लावण्यासाठी खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांना साधे निमंत्रणही नाही. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी समाज माध्यमांवरून व्हायरल केलेल्या संदेशात त्यांचे नाव व छायाचित्रही नाही. त्यावरून आता गोरेगावकर समर्थक पुन्हा बुचकळ्यात पडले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाईपर्यंत सर्व काही ठीक होते. आता अचानकच पुन्हा चित्र का बदलले, असा सवाल केला जात आहे.काँग्रेसमधील गट-तट नेहमीच पराभवाला कारण ठरत असतात. मागच्या जि.प. निवडणुकीतही तोच अनुभव आला होता. आता पुन्हा लोकसभेला तेच चित्र निर्माण झाले आहे. भाजपमधून उमेदवारीसाठीच काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष वानखेडे यांना नीट काही कळायच्या आतच हे सगळे प्रकार घडून जात आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघात जोर असतानाही एकही मूळकाँग्रेसी का उभा राहिला नाही, यामागचे गणित त्यांना कळाले असेल. त्यांनी वेळीच सावरून न नेल्यास बळीचा बकरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मतभेदांची ही भिंत तोडायची कशी, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस