शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:54 IST

लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.गुजरात राज्याच्या जबाबदारीमुळे खा.राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे राज्य असल्याने त्यांना पूर्ण वेळ मिळण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र सातव यांच्यानंतर दुसरा कोणी सक्षम उमेदवार समोर आला नाही. इतर अनेकांना विधानसभा निवडणूकच लढवायची आहे. त्यामुळे ऐनवेळी माजी खा.सुभाष वानखेडे यांना आयात करावे लागले. त्यांची निवड करताना लोकसभेत येणाऱ्या आघाडीच्या सर्व आजी-माजी आमदारांना विश्वासात घेतले. एवढेच नव्हे, तर निवडून आणण्याची जबाबदारीही दिली. या सर्व प्रकारांत हिंगोलीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे आघाडीवर होते. तसेच आ.प्रदीप नाईक, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.विजय खडसे यांनाही विचारणा झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक राव चव्हाण, खा.राजीव सातव यांनी वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र आता हिंगोली विधासनभेतच अडचण निर्माण झाली आहे. प्रचारयंत्रणा कामाला लावण्यासाठी खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांना साधे निमंत्रणही नाही. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी समाज माध्यमांवरून व्हायरल केलेल्या संदेशात त्यांचे नाव व छायाचित्रही नाही. त्यावरून आता गोरेगावकर समर्थक पुन्हा बुचकळ्यात पडले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाईपर्यंत सर्व काही ठीक होते. आता अचानकच पुन्हा चित्र का बदलले, असा सवाल केला जात आहे.काँग्रेसमधील गट-तट नेहमीच पराभवाला कारण ठरत असतात. मागच्या जि.प. निवडणुकीतही तोच अनुभव आला होता. आता पुन्हा लोकसभेला तेच चित्र निर्माण झाले आहे. भाजपमधून उमेदवारीसाठीच काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष वानखेडे यांना नीट काही कळायच्या आतच हे सगळे प्रकार घडून जात आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघात जोर असतानाही एकही मूळकाँग्रेसी का उभा राहिला नाही, यामागचे गणित त्यांना कळाले असेल. त्यांनी वेळीच सावरून न नेल्यास बळीचा बकरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मतभेदांची ही भिंत तोडायची कशी, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस