शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:54 IST

लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.गुजरात राज्याच्या जबाबदारीमुळे खा.राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे राज्य असल्याने त्यांना पूर्ण वेळ मिळण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र सातव यांच्यानंतर दुसरा कोणी सक्षम उमेदवार समोर आला नाही. इतर अनेकांना विधानसभा निवडणूकच लढवायची आहे. त्यामुळे ऐनवेळी माजी खा.सुभाष वानखेडे यांना आयात करावे लागले. त्यांची निवड करताना लोकसभेत येणाऱ्या आघाडीच्या सर्व आजी-माजी आमदारांना विश्वासात घेतले. एवढेच नव्हे, तर निवडून आणण्याची जबाबदारीही दिली. या सर्व प्रकारांत हिंगोलीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे आघाडीवर होते. तसेच आ.प्रदीप नाईक, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.विजय खडसे यांनाही विचारणा झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक राव चव्हाण, खा.राजीव सातव यांनी वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र आता हिंगोली विधासनभेतच अडचण निर्माण झाली आहे. प्रचारयंत्रणा कामाला लावण्यासाठी खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांना साधे निमंत्रणही नाही. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी समाज माध्यमांवरून व्हायरल केलेल्या संदेशात त्यांचे नाव व छायाचित्रही नाही. त्यावरून आता गोरेगावकर समर्थक पुन्हा बुचकळ्यात पडले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाईपर्यंत सर्व काही ठीक होते. आता अचानकच पुन्हा चित्र का बदलले, असा सवाल केला जात आहे.काँग्रेसमधील गट-तट नेहमीच पराभवाला कारण ठरत असतात. मागच्या जि.प. निवडणुकीतही तोच अनुभव आला होता. आता पुन्हा लोकसभेला तेच चित्र निर्माण झाले आहे. भाजपमधून उमेदवारीसाठीच काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष वानखेडे यांना नीट काही कळायच्या आतच हे सगळे प्रकार घडून जात आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघात जोर असतानाही एकही मूळकाँग्रेसी का उभा राहिला नाही, यामागचे गणित त्यांना कळाले असेल. त्यांनी वेळीच सावरून न नेल्यास बळीचा बकरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मतभेदांची ही भिंत तोडायची कशी, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस