शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:47 IST

अनेक गावांमधील स्मशानभूमीत टिनशेडची दुरवस्था

ठळक मुद्देपावसाळ्यात होतेय मोठी गैरसोय प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

- सुनील काकडे

हिंगोली : जिल्ह्यात ७११ गावे आहेत. त्यातील तब्बल १५६ गावांमध्ये अद्याप स्मशानभूमीची व्यवस्थाच उभी झालेली नाही. त्यामुळे मृतकांवर अंत्यसंस्कार नेमके करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतांमध्ये उघड्यावर चिताग्नी दिला जातो; मात्र पावसाळ्यात सरणावर पाणी पडून ते वारंवार विझण्याचा प्रकार घडतो. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्या गावांमध्ये स्मशानभूमी आहे, त्यातीलही अनेक ठिकाणच्या स्मशानभूमीतील टिनशेडची दुरवस्था झाली आहे. 

हिंगोली तालुक्यात ४३, सेनगाव तालुक्यातील २५, वसमत ३२, औंढा नागनाथ २६ आणि कळमनुरी तालुक्यातील ५० गावांमध्ये आजही स्मशानभूमीची व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. परिणामी, गावातील कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करताना विविध अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यात हा त्रास अधिकच बळावतो. प्रशासकीय यंत्रणेने ही बाब लक्षात घेता सुविधांयुक्त  स्मशानभूमी उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

मु.पो. सवना, ता. सेनगावसेनगाव तालुक्यातील सवना या गावात बौद्ध आणि बंजारा समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे; मात्र हिंदू समाजबांधवांकरिता अद्याप ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी या समाजासाठी स्मशानभूमीची जागा आरक्षित करण्यात आली आहे. असे असले तरी त्याठिकाणी टिनशेड किंवा बैठक व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. यामुळे विशेषत: पावसाळ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्वधर्मियांकरिता स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; परंतु दुर्लक्ष करण्यात आले.

मु.पो. अंभेरी, ता. हिंगोलीहिंगोली तालुक्यातील अंभेरी येथे एकाठिकाणी मुस्लिम समाजबांधवांसाठी स्मशानभूमीची थोडीफार जागा उपलब्ध करून देण्यात आली. हा अपवाद वगळता अन्य समाजांकरिता आजही स्मशानभूमीची कुठलीच सोय उपलब्ध नाही. यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास ओबडधोबड रस्त्याने अंत्ययात्रा काढून मृतकांवर शेतात उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशात पाऊस झाल्यास सरणावर पाणी पडून ते वारंवार विझत असल्याने मृत्यूनंतर मृतदेहांची यामुळे अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिक करित आहेत.

जनसुविधा योजनेतून स्मशानभूमींचा विकास करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. ज्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी उभारण्यात आलेली नाही, अशा गावांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल.- आर.बी. शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू