शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:47 IST

अनेक गावांमधील स्मशानभूमीत टिनशेडची दुरवस्था

ठळक मुद्देपावसाळ्यात होतेय मोठी गैरसोय प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

- सुनील काकडे

हिंगोली : जिल्ह्यात ७११ गावे आहेत. त्यातील तब्बल १५६ गावांमध्ये अद्याप स्मशानभूमीची व्यवस्थाच उभी झालेली नाही. त्यामुळे मृतकांवर अंत्यसंस्कार नेमके करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतांमध्ये उघड्यावर चिताग्नी दिला जातो; मात्र पावसाळ्यात सरणावर पाणी पडून ते वारंवार विझण्याचा प्रकार घडतो. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्या गावांमध्ये स्मशानभूमी आहे, त्यातीलही अनेक ठिकाणच्या स्मशानभूमीतील टिनशेडची दुरवस्था झाली आहे. 

हिंगोली तालुक्यात ४३, सेनगाव तालुक्यातील २५, वसमत ३२, औंढा नागनाथ २६ आणि कळमनुरी तालुक्यातील ५० गावांमध्ये आजही स्मशानभूमीची व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. परिणामी, गावातील कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करताना विविध अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यात हा त्रास अधिकच बळावतो. प्रशासकीय यंत्रणेने ही बाब लक्षात घेता सुविधांयुक्त  स्मशानभूमी उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

मु.पो. सवना, ता. सेनगावसेनगाव तालुक्यातील सवना या गावात बौद्ध आणि बंजारा समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे; मात्र हिंदू समाजबांधवांकरिता अद्याप ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी या समाजासाठी स्मशानभूमीची जागा आरक्षित करण्यात आली आहे. असे असले तरी त्याठिकाणी टिनशेड किंवा बैठक व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. यामुळे विशेषत: पावसाळ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्वधर्मियांकरिता स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; परंतु दुर्लक्ष करण्यात आले.

मु.पो. अंभेरी, ता. हिंगोलीहिंगोली तालुक्यातील अंभेरी येथे एकाठिकाणी मुस्लिम समाजबांधवांसाठी स्मशानभूमीची थोडीफार जागा उपलब्ध करून देण्यात आली. हा अपवाद वगळता अन्य समाजांकरिता आजही स्मशानभूमीची कुठलीच सोय उपलब्ध नाही. यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास ओबडधोबड रस्त्याने अंत्ययात्रा काढून मृतकांवर शेतात उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशात पाऊस झाल्यास सरणावर पाणी पडून ते वारंवार विझत असल्याने मृत्यूनंतर मृतदेहांची यामुळे अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिक करित आहेत.

जनसुविधा योजनेतून स्मशानभूमींचा विकास करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. ज्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी उभारण्यात आलेली नाही, अशा गावांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल.- आर.बी. शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू