शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सावित्रीच्या लेकींना सायकल मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:26 IST

अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत सायकल वाटप कधी करण्यात येणार असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत सायकल वाटप कधी करण्यात येणार असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून मात्र याबाबत हवी तशी दखल घेतली जात नाही, शिवाय सध्या प्रक्रिया सुरूच असल्याचे सोपस्कार उत्तर मिळत आहे.शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मानव विकास कार्यक्रम योजने अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर वर्गही करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबर रोजी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर सायकल वाटपची रक्कम जमा करण्यात येणार होती. परंतु सदर रक्कम जमा झाली किंवा नाही, याबाबत माध्यमिक शिक्षणच्या संबधित विभागाकडून सांगण्यात टाळाटाळ केली जात आहे.परंतु याकामी होणारी संबधितांची दिरंगाई व नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडल्या नाही. त्यामुळे ग्रामीण मुलींची पायपीट होते. सध्या माध्यमिक शिक्षण खात्याला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे येथील अनेक कामांचा खोळंबा उडत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे माध्यमिकचा प्रभार आहे. परंतु दोन्ही कामांचा व्याप पाहता कार्यालयीन इतर कामांचा खोळंबा उडत आहे. मुलींना मोफत सायकल वाटपासाठी लागणाऱ्या निधीस तांत्रिक मान्यता मिळाली. १७ आॅक्टोबर रोजी जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजारांचा निधी वर्ग करण्यात आला. संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर हा निधी वर्ग केला जाणार होता. सोमवारपर्यंत निधी वर्ग करण्याचे नियोजन होते. या ताळमेळात मात्र हजारो गरजू मुली सायकलच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे संबधित अधिकारी खरंच लक्ष देतील का? मुलींच्या हाती आतातरी सायकल पडतील का? हे सांगणे मात्र कठीण आहे.शाळेतील मुलींची गळती थांबावी व शाळेत येताना विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्या अनुषंगानेच मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतरावर राहणाºया गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. परंतु योजनेचा लाभ कधीच वेळेत मिळत नाही. अर्धे वर्ष उलटन्यानंतर मुलींच्या हाती सायकली पडत नाहीत. शासनाकडून आलेला निधी वेळेत बँकेत वर्ग होत नाही. यासह विविध कारणांमुळे मात्र मोफत सायकल विद्यार्थिनींना वेळेत मिळत नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा