शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

हिंगोलीत यंदाही गहू, हरभरा पेरणीत वाढ; 1.56 लाख हेक्टरवर होणार रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 17:26 IST

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे.

ठळक मुद्देहरभरा आणि गव्हाच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ होणे अपेक्षित

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात कृषी विभागाकडून १ लाख ५६ हजार ८४४ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही हरभरा आणि गहू या पिकाखालील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. त्यानुसार, ५१ हजार ३२६ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. येलदरी, सिद्धेश्वर, इसापूर या मोठ्या प्रकल्पांसह छोटे, मध्यम प्रकल्प, नदी-नाल्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असून विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीही वाढ झालेली आहे. पर्यायाने बहुतांश शेतकऱ्यांकडे यंदा ओलिताची सुविधा असल्याने रबी हंगामातील प्रमुख पीके असलेल्या हरभरा आणि गव्हाच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ होणे अपेक्षित आहे.जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ८४४ हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून त्यात सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे व त्याखालोखाल गहू आणि ज्वारी या पिकांचा पेरा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही वर्षांप्रमाणे यंदाच्या हंगामातही करडई, सूर्यफूल या गळीत धान्य पिकांच्या क्षेत्रात घट होण्याचे संकेत आहेत.

प्रस्तावित पेरणी क्षेत्रासाठी बियाणे बदलाचे प्रमाण निश्चित करून एकूण ५१ हजार ३२६ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. रबी हंगामाच्या नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत एकूण ६२ हजार ८३३ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यात युरिया १७ हजार ६७ टन, डीएपी ११ हजार ७५७ टन, पोटॅश ६ हजार ११७ टन, संयुक्त खते (एनपीके) २० हजार ८९२ टन, सिंगल सुपर फॉस्पेट ७ हजार टन या खतांचा समावेश आहे, अशी माहिती कृषी अधीक्षकांनी दिली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली