शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खिचडी शिजवणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची ...

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. या कामांमुळे त्यांच्या मूळ कर्तव्यापासून दूर नेले जात असून यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांकडून अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे, असा सूर उमटत आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८७९ शाळा असून यात सुमारे पावणेचार हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामेच करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारचे अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांंनाही या कामांना जुंपले आहे. शाळा बांधकाम, शालेय पोषण आहार, शालेय शिक्षण समितीच्या कामामुळे तर गावातील राजकारण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यातील सर्वच शाळांतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत आहे. एक शिक्षकी शाळेत तर तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी तर मध्यांतरानंतर शाळा बंद ठेवून तालुका गाठावा लागतो. दोन शिक्षकी शाळा असली तरी यातील एक शिक्षक कायम अशैक्षणिक कामात गुंतलेला असतो. त्यामुळे यात शिक्षकासह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

- शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत विद्यार्थ्याना आहार पुरविणे, बीएलओ म्हणून काम करणे, शालेय शिक्षण समिती, स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, विविध सर्वेक्षण करणे, जंतच्या गोळ्याचे वाटप करणे, कोरोना प्रतिबंधात्मक कामे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बँकेत खाते काढणे आदी कामे करावी लागत आहेत.

शिक्षक संघटना काय म्हणतात...

शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने अध्यापनाच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असून शासनाने शिक्षकांकडील अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे.

- रामदास कावरखे, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

राष्ट्रीय कामे वगळता इतर सर्व कामे शिक्षकांकडील काढून घ्यावीत. तशी शिक्षक संघटनांची मागणीही आहे. शाळा बांधकामासारख्या कामांमुळे शिक्षकांवर नाहक नोकरी गमावण्याची वेळ येत आहे.

- सुभाष जिरवणकर, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

अशैक्षणिक कामे देता येत नाहीत

कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देता येत नाहीत. शालेय पोषण आहाराच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. निवडणूक, जनगणना तसेच विविध सर्वेक्षणाच्या अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम होतो. त्यामुळे ही कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत, असे मत शिक्षकांतून व्यक्त होत आहे.

-खिचडी शिजवून मुलांना वाटप करणे

-आधारकार्ड तयार करणे, शाळेची डागडुजी करणे

-आरोग्यविषयक सर्वेक्षण करणे

-कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे