शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

खिचडी शिजवणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची ...

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. या कामांमुळे त्यांच्या मूळ कर्तव्यापासून दूर नेले जात असून यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांकडून अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे, असा सूर उमटत आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८७९ शाळा असून यात सुमारे पावणेचार हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामेच करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारचे अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांंनाही या कामांना जुंपले आहे. शाळा बांधकाम, शालेय पोषण आहार, शालेय शिक्षण समितीच्या कामामुळे तर गावातील राजकारण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यातील सर्वच शाळांतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत आहे. एक शिक्षकी शाळेत तर तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी तर मध्यांतरानंतर शाळा बंद ठेवून तालुका गाठावा लागतो. दोन शिक्षकी शाळा असली तरी यातील एक शिक्षक कायम अशैक्षणिक कामात गुंतलेला असतो. त्यामुळे यात शिक्षकासह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

- शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत विद्यार्थ्याना आहार पुरविणे, बीएलओ म्हणून काम करणे, शालेय शिक्षण समिती, स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, विविध सर्वेक्षण करणे, जंतच्या गोळ्याचे वाटप करणे, कोरोना प्रतिबंधात्मक कामे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बँकेत खाते काढणे आदी कामे करावी लागत आहेत.

शिक्षक संघटना काय म्हणतात...

शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने अध्यापनाच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असून शासनाने शिक्षकांकडील अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे.

- रामदास कावरखे, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

राष्ट्रीय कामे वगळता इतर सर्व कामे शिक्षकांकडील काढून घ्यावीत. तशी शिक्षक संघटनांची मागणीही आहे. शाळा बांधकामासारख्या कामांमुळे शिक्षकांवर नाहक नोकरी गमावण्याची वेळ येत आहे.

- सुभाष जिरवणकर, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

अशैक्षणिक कामे देता येत नाहीत

कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देता येत नाहीत. शालेय पोषण आहाराच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. निवडणूक, जनगणना तसेच विविध सर्वेक्षणाच्या अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम होतो. त्यामुळे ही कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत, असे मत शिक्षकांतून व्यक्त होत आहे.

-खिचडी शिजवून मुलांना वाटप करणे

-आधारकार्ड तयार करणे, शाळेची डागडुजी करणे

-आरोग्यविषयक सर्वेक्षण करणे

-कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे