शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

खिचडी शिजवणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची ...

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. या कामांमुळे त्यांच्या मूळ कर्तव्यापासून दूर नेले जात असून यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांकडून अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे, असा सूर उमटत आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८७९ शाळा असून यात सुमारे पावणेचार हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामेच करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारचे अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांंनाही या कामांना जुंपले आहे. शाळा बांधकाम, शालेय पोषण आहार, शालेय शिक्षण समितीच्या कामामुळे तर गावातील राजकारण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यातील सर्वच शाळांतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत आहे. एक शिक्षकी शाळेत तर तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी तर मध्यांतरानंतर शाळा बंद ठेवून तालुका गाठावा लागतो. दोन शिक्षकी शाळा असली तरी यातील एक शिक्षक कायम अशैक्षणिक कामात गुंतलेला असतो. त्यामुळे यात शिक्षकासह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

- शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत विद्यार्थ्याना आहार पुरविणे, बीएलओ म्हणून काम करणे, शालेय शिक्षण समिती, स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, विविध सर्वेक्षण करणे, जंतच्या गोळ्याचे वाटप करणे, कोरोना प्रतिबंधात्मक कामे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बँकेत खाते काढणे आदी कामे करावी लागत आहेत.

शिक्षक संघटना काय म्हणतात...

शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने अध्यापनाच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असून शासनाने शिक्षकांकडील अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे.

- रामदास कावरखे, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

राष्ट्रीय कामे वगळता इतर सर्व कामे शिक्षकांकडील काढून घ्यावीत. तशी शिक्षक संघटनांची मागणीही आहे. शाळा बांधकामासारख्या कामांमुळे शिक्षकांवर नाहक नोकरी गमावण्याची वेळ येत आहे.

- सुभाष जिरवणकर, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

अशैक्षणिक कामे देता येत नाहीत

कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देता येत नाहीत. शालेय पोषण आहाराच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. निवडणूक, जनगणना तसेच विविध सर्वेक्षणाच्या अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम होतो. त्यामुळे ही कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत, असे मत शिक्षकांतून व्यक्त होत आहे.

-खिचडी शिजवून मुलांना वाटप करणे

-आधारकार्ड तयार करणे, शाळेची डागडुजी करणे

-आरोग्यविषयक सर्वेक्षण करणे

-कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे