शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खिचडी शिजवणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकाची कामे झाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची ...

हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. या कामांमुळे त्यांच्या मूळ कर्तव्यापासून दूर नेले जात असून यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांकडून अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे, असा सूर उमटत आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८७९ शाळा असून यात सुमारे पावणेचार हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामेच करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारचे अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांंनाही या कामांना जुंपले आहे. शाळा बांधकाम, शालेय पोषण आहार, शालेय शिक्षण समितीच्या कामामुळे तर गावातील राजकारण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यातील सर्वच शाळांतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत आहे. एक शिक्षकी शाळेत तर तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी तर मध्यांतरानंतर शाळा बंद ठेवून तालुका गाठावा लागतो. दोन शिक्षकी शाळा असली तरी यातील एक शिक्षक कायम अशैक्षणिक कामात गुंतलेला असतो. त्यामुळे यात शिक्षकासह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

- शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत विद्यार्थ्याना आहार पुरविणे, बीएलओ म्हणून काम करणे, शालेय शिक्षण समिती, स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, विविध सर्वेक्षण करणे, जंतच्या गोळ्याचे वाटप करणे, कोरोना प्रतिबंधात्मक कामे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बँकेत खाते काढणे आदी कामे करावी लागत आहेत.

शिक्षक संघटना काय म्हणतात...

शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने अध्यापनाच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असून शासनाने शिक्षकांकडील अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे.

- रामदास कावरखे, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

राष्ट्रीय कामे वगळता इतर सर्व कामे शिक्षकांकडील काढून घ्यावीत. तशी शिक्षक संघटनांची मागणीही आहे. शाळा बांधकामासारख्या कामांमुळे शिक्षकांवर नाहक नोकरी गमावण्याची वेळ येत आहे.

- सुभाष जिरवणकर, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली

अशैक्षणिक कामे देता येत नाहीत

कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देता येत नाहीत. शालेय पोषण आहाराच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. निवडणूक, जनगणना तसेच विविध सर्वेक्षणाच्या अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम होतो. त्यामुळे ही कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत, असे मत शिक्षकांतून व्यक्त होत आहे.

-खिचडी शिजवून मुलांना वाटप करणे

-आधारकार्ड तयार करणे, शाळेची डागडुजी करणे

-आरोग्यविषयक सर्वेक्षण करणे

-कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे