शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

पाण्यासाठी अडवणूक का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:04 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील वडद व टाकळखोपा येथील अधिग्रहणाचा प्रस्ताव महिना ते दीड महिना प्रलंबित ठेवून सर्वसाधारण सभेत विषय निघाल्याच्या दुसऱ्या दिवशी मंजूर झाला. टंचाईच्या काळातही लोकांची अशी अडवणूक का केली जात आहे, असा सवाल शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील वडद व टाकळखोपा येथील अधिग्रहणाचा प्रस्ताव महिना ते दीड महिना प्रलंबित ठेवून सर्वसाधारण सभेत विषय निघाल्याच्या दुसऱ्या दिवशी मंजूर झाला. टंचाईच्या काळातही लोकांची अशी अडवणूक का केली जात आहे, असा सवाल शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे तर सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, सुनंदा नाईक, रेणुका जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी आहेर म्हणाले, वडद व टाकळखोपा येथील प्रस्ताव रखडण्यामागे संयुक्त पाहणीचे कारण बीडीओंकडून सांगितले जात आहे. मग एकाच दिवसात ही पाणी कशी पूर्ण झाली? त्याअगोदर त्याला का मुहूर्त मिळत नव्हता? याला अडवणूक म्हणायचे नाही तर काय, असे सवाल करताच सगळे निरुत्तर झाले. यावेळी वसमत तालुक्यातील विहिरींचा प्रश्नही गाजला. सभापती प्रल्हाद राखोंडे व अंकुश आहेर यांनी यात प्रश्नांची सरबत्ती केली. ५९२ विहिरींना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे मागच्या बैठकीत सांगितले होते. त्यांचा प्रस्ताव पाठविला तर त्यात अनेक त्रुटी आहेत. छाननी समितीने त्यामुळे मंजुरी दिली नाही. शिवाय तांत्रिक मान्यतेसाठीही कोणी तयार होत नाही. अनेकदा माणसे बदलली जात आहेत. ही कामे होवूच नयेत, याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर ही कामे करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी जातीने लक्ष घालण्याचा आदेश सीईओ तुम्मोड यांनी दिला. तर वित्त विभागातही जि.प.त हेडच नसलेल्या कामांचा ठराव घेण्याचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप आहेर यांनी केला. जि.प.कडे लेखाशीर्ष नसलेल्या कामांसाठी जि.प. एक एजन्सी म्हणून काम करते. अशा कामांसाठी समितीत चर्चा, ठरावाची काय गरज, असा सवालही आहेर यांनी केला. कोणत्या नियमान्वये हे सांगितले जात असल्याची त्यांनी विचारणा केली. त्यावर वित्त अधिकारी डी.के.हिवाळे यांनी क.१00 अंतर्गत कामे आल्यास अशा कामांसाठी जिल्हा परिषदेत पुन्हा चर्चा करण्याची अथवा ठराव घेण्याची गरज नाही. मात्र क.१२३ अथवा इतर योजनांत अशा प्रकारचा ठराव घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाºयांकडे गेल्यावर बराच वेळ वेटिंग करावी लागते. जि.प.सदस्य असल्याने इतर कामांच्या व्यापात वेळ नसल्याने जि.प.सदस्यांना भेट घेण्यास वेळ लागू नये, असा ठराव घेण्याची मागणी जि.प.सदस्य अजित मगर यांनी केली. मात्र इतर सदस्य व पदाधिकाºयांनी त्यांना समजावत त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून हा मुद्दा मांडू. अशा पद्धतीने ठराव घेणे योग्य वाटत नसल्याचे सांगितले. त्यानंतर मगर यांनी यावर पदाधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करावी, वेळेत भेट झाली पाहिेजे, असे मत मांडले.जि.प.सदस्या सुवर्णमाला शिंदे यांनी वसमत तालुक्यातील कोठारी येथील प्रकरणात ग्रामसेवकावर कारवाई झाली. मात्र सरपंचावरील कारवाई का होत नाही, अशी विचारणा केली. त्यात प्रशासनातूनच परस्परविरोधी उत्तरे ऐकायला मिळाली.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई