शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

अनाथ, निराधारांनी काय खायचे ? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

हिंगोली : मागील वर्षभरापासून कोरोना आजाराचे रूग्ण वाढत् आहेत. कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रातील घटकांना फटका ...

हिंगोली : मागील वर्षभरापासून कोरोना आजाराचे रूग्ण वाढत् आहेत. कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रातील घटकांना फटका बसला आहे. याचा परिणाम अनाथ, निराधारांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थानाही बसत आहे. अनाथ, निराधाराचा खर्च भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे १९ निरीक्षण गृहाची तर ३ बालसंगोपन गृहाची नोंद झाली होती. मात्र सध्या दोनच निरीक्षण गृह कार्यरत आहेत. यामाध्यमातून विधी पीडित, अनाथ, वाममार्गाला लागलेल्या बालकांना सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. या बालगृहाला शासनाकडून मदत दिली जाते. परंतु, शासनाची एक रूपयाचीही मदत न घेता अनाथ, निराधार, वृद्ध, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था कार्य करतात. या संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मदत होत होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना काम करताना उर्जा मिळत होती. यातील निराधार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत आहे. मात्र मागील एक वर्षापाासून देशभरात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकांनाच घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. निराधार, अनाथांसाठी काम करणाऱ्या संस्थासमोर तर मोठा प्रश्न उभा राहत आहे. कोरोनामुळे दानशूर व्यक्तीकडून मिळणारी मदतीचा ओघ आटल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खर्च भागविताना काटकसर करावी लागत आहे.

बालकांच्या संगोपनासाठी निधीची अडचण

साथ फाऊंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संस्थेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची व ऊस तोड कामगारांची ४० मुले आहेत. त्यांच्या शिक्षण व संगोपनाचा महिन्याकाठी किमान १ लाख रूपयांचा खर्च येतो. हा खर्च दानशूर संस्था, व्यक्तींनी दिलेल्या मदतीतून भागविला जात होता. तसेच व्याख्यानातूनही मदत मिळत होती. मात्र कोरोनामुळे मदतीचा ओघ आटला आहे. व्याख्यान कार्यक्रमही होत नाहीत. त्यामुळे येणारी मदत आटली आहे. परिणामी खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

निरीक्षण गृहातील मदत आटली

जिल्ह्यात सध्या दोनच निरीक्षण गृह कार्यरत आहेत. हिंगोली येथील सरस्वती मुलींचे निरीक्षण गृहात सध्या २० बालके आहेत. या बालकांचा खर्च शासन भागवित आहे. या निरीक्षण गृहातील बालकांसोबत आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करून दानशूर व्यक्ती बालकांना खाऊ, कपडे, शैक्षणिक साहित्याची मदत देत होते. यातून बालगृहातील बालकांचे मन रमत होते. व वेगळा आनंद मिळत होता. मात्र कोरोनामुळे दानशूर व्यक्तीकडून होणारी मदत आटली आहे. खानापूर चित्ता येथील श्री स्वामी समर्थ बालगृहात १६ बालके आहेत.

प्रतिक्रिया...

साथ फाऊंडेशनच्या माध्यमातून व लोकसहभागातून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ऊसतोड कामगार, निराधार आदी मुलांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनापूर्वी दानशूर व्यक्ती मदत देत होते. मात्र कोरोनामुळे मदतीचा ओघ कमी झाला आहे. परिणामी बालकांचे संगोपन करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

- मीरा धनराज कदम, साथ फाऊंडेशन संस्थाचालक

निराधार, अनाथ, अत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले यांच्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. निस्वार्थ सेवेतून कार्य करीत असले तरी बालकांचे संगोपन करण्यासाठी मोठा खर्च येतो. दानशून व्यक्तींनी मदत केली तर ह्या संस्था टिकण्यास मदत होते. तसेच बालकांना शिक्षण, निवारा मिळून चांगले जीवन जगण्यासाठी मदत होते.

- चंद्रकांत पाईकराव, सामाजिक कार्यकर्ते