शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

विहिरींची देयके पं.स.तून मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:28 IST

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला कृषी विभागाच्या आदिवासी उपाययोजना व विशेष घटक योजनेतील विहिरींच्या देयकांचा मुद्दा अखेर कृषी संचालकांच्या आदेशानंतर निकाली निघाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला कृषी विभागाच्या आदिवासी उपाययोजना व विशेष घटक योजनेतील विहिरींच्या देयकांचा मुद्दा अखेर कृषी संचालकांच्या आदेशानंतर निकाली निघाला आहे. सर्व पंचायत समित्यांतूनच ही देयके अदा करण्यास सांगण्यात आले आहे.२0१६-१७ मध्ये आदिवासी उपयोजनेतून नवीन २२७ विहिरी व ३६ इतर बाबींना म्हणजे मोटार पंप, पाईपलाईन, जुन्या विहिरींचे खोदकाम आदी बाबींना मंजुरी मिळाली होती. यापैकी २२ विहिरी त्याच वर्षात पूर्ण झाल्या व देयकेही अदा झाली होती. तर सध्या ३६ देयके आली आहेत. मात्र ही देयके अदा करण्यासाठी निधीच नाही. यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी यांच्याकडे मागणी केली आहे. या कार्यालयाने लवकरच निधी अदा करण्यात येईल, असे सांगितले आहे. १.४५ कोटींचा हा प्रस्ताव आहे. इतर सुरू असलेली कामेही टप्प्या-टप्प्याने पूर्ण होत असून देयके सादर होत आहेत.देयके अदा होत नसल्याचा मुद्दा प्रथम जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनी मांडला होता. आज अंकुश आहेर यांनीही स्थायीत तो मांडला.वाळूसह गिट्टीही मिळेनाअनेक विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले मात्र वाळू व गिट्टीअभावी पुढील काम थांबले आहे. कळमनुरी तालुक्यात तर वाळूसह गिट्टीही मिळत नसल्याची बोंब आहे.विशेष घटक योजनेत २0१६-१७ या आर्थिक वर्षात ४२८ विहिरी व १३0 इतर बाबींना मंजुरी मिळाली होती. यापैकी ७१ विहिरी त्याच वर्षी पूर्ण झाल्या व देयकेही अदा झाली. मात्र ८८ देयके जि.प.त प्रलंबित आहेत. ती कोणी अदा करायची यातच मागील दोन महिने निघून गेली. यावर निर्णय न झाल्याने शेवटी कृषी संचालकांच्या पत्रानुसार पं.स.ला ती पाठविली जाणार आहेत. तर या योजनेत ११६ विहिरींचे खोदकाम झाले असून १४५ ची कामे प्रगतीत असल्याचे सांगण्यात आले.