शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

२९ गावांत जलयुक्त ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:18 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.जलयुक्त शिवार योजनेबाबत मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यंत्रणांना कडक सूचना देत कामांना गती देण्यास बजावले आहे. मात्र तरीही अनेक यंत्रणांची कामे धिम्या गतीनेच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूण ८० पैकी २९ गावांत अजून एकही काम हाती घेतलेले नाही. या योजनेत अवघा ३.८५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.चालू वर्षांत ढाळीच्या बांधाचे २३६ कामे प्रस्तावित असून १९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. १२ कामे सुरू झाली असून, ३८ लाख खर्ची पडले आहेत. सलग समतल चर (हेक्टर संख्या) १३ कामे प्रस्तावित असून ४ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. खोल सलग समतल चर २७५ कामे प्रस्तावित असून ६१ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. अनघड दगडी बांध २७, अर्दन स्ट्रक्चर १६, शेततळ्यांची ४५६ कामे प्रस्तावित असून १५५ निविदा पूर्ण झाल्या असून ९० कामे सुरू आहेत. तर ३ लाख खर्ची पडले आहेत. माती नाला बांध ११० कामे प्रस्तावित आहेत. साखळी सिमेंट बंधारा १८५ कामे प्रस्तावित असून ९ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. २ कामे सुरू असून ३ लाख खर्च झाले आहेत. नाला खोलीकरण/सरळीकरण २०१ कामे प्रस्तावित असून ९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. ४५ कामे सुरू असून ४३ लाख खर्च झाला आहे. रिचार्ज शाष्ट २६९ कामे प्रस्तावित आहेत. ठिबक सिंचन २१५ प्रस्तावित कामे असून ३७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. १९५ कामांना सुरूवात झाली असून ७४ लाख खर्च झाले आहेत.तूषार सिंचन २१६ प्रस्तावित कामे असून ५७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. २८८ कामांना सुरूवात झाली असून २९ लाख खर्च झाले आहेत. बंधारे ५०, रिचार्ज ट्रेंच १६, जुन्या सरंचना दुरूस्ती व तळ खो. ५४, नाला खो. रा. व सिएनबी २१ व इतर ३ प्रस्तावित कामांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार योजनेत शासनाने नव्याने काही बदल केले आहेत. त्यानुसार आता माथा येथे पायथा अशी जल व मृदासंधारणाचे उपाय अनिवार्य केले आहेत. यापूर्वी या निकषांना तेवढे प्राधान्य दिले न गेल्याने अनेक ठिकाणी खालची कामे गाळल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे अशा गावांना या कामांचा जास्त काळ फायदा होणे अवघड आहे. हे टाळण्यासाठीअधिकाºयांनी अधिक सूक्ष्म नियोजन करण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने विचार केला तर आता ही कामे सुरू होणे गरजेचे आहे. फेब्रुवारी महिना संपत आल्याने आता पावसाळ्यापूर्वी केवळ तीन उरले आहेत. त्यामुळे ८० गावे १०० टक्के कामे पूर्ण करून बाहेर काढण्याचे आव्हान आहे.