शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

२९ गावांत जलयुक्त ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:18 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.जलयुक्त शिवार योजनेबाबत मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यंत्रणांना कडक सूचना देत कामांना गती देण्यास बजावले आहे. मात्र तरीही अनेक यंत्रणांची कामे धिम्या गतीनेच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूण ८० पैकी २९ गावांत अजून एकही काम हाती घेतलेले नाही. या योजनेत अवघा ३.८५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.चालू वर्षांत ढाळीच्या बांधाचे २३६ कामे प्रस्तावित असून १९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. १२ कामे सुरू झाली असून, ३८ लाख खर्ची पडले आहेत. सलग समतल चर (हेक्टर संख्या) १३ कामे प्रस्तावित असून ४ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. खोल सलग समतल चर २७५ कामे प्रस्तावित असून ६१ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. अनघड दगडी बांध २७, अर्दन स्ट्रक्चर १६, शेततळ्यांची ४५६ कामे प्रस्तावित असून १५५ निविदा पूर्ण झाल्या असून ९० कामे सुरू आहेत. तर ३ लाख खर्ची पडले आहेत. माती नाला बांध ११० कामे प्रस्तावित आहेत. साखळी सिमेंट बंधारा १८५ कामे प्रस्तावित असून ९ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. २ कामे सुरू असून ३ लाख खर्च झाले आहेत. नाला खोलीकरण/सरळीकरण २०१ कामे प्रस्तावित असून ९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. ४५ कामे सुरू असून ४३ लाख खर्च झाला आहे. रिचार्ज शाष्ट २६९ कामे प्रस्तावित आहेत. ठिबक सिंचन २१५ प्रस्तावित कामे असून ३७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. १९५ कामांना सुरूवात झाली असून ७४ लाख खर्च झाले आहेत.तूषार सिंचन २१६ प्रस्तावित कामे असून ५७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. २८८ कामांना सुरूवात झाली असून २९ लाख खर्च झाले आहेत. बंधारे ५०, रिचार्ज ट्रेंच १६, जुन्या सरंचना दुरूस्ती व तळ खो. ५४, नाला खो. रा. व सिएनबी २१ व इतर ३ प्रस्तावित कामांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार योजनेत शासनाने नव्याने काही बदल केले आहेत. त्यानुसार आता माथा येथे पायथा अशी जल व मृदासंधारणाचे उपाय अनिवार्य केले आहेत. यापूर्वी या निकषांना तेवढे प्राधान्य दिले न गेल्याने अनेक ठिकाणी खालची कामे गाळल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे अशा गावांना या कामांचा जास्त काळ फायदा होणे अवघड आहे. हे टाळण्यासाठीअधिकाºयांनी अधिक सूक्ष्म नियोजन करण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने विचार केला तर आता ही कामे सुरू होणे गरजेचे आहे. फेब्रुवारी महिना संपत आल्याने आता पावसाळ्यापूर्वी केवळ तीन उरले आहेत. त्यामुळे ८० गावे १०० टक्के कामे पूर्ण करून बाहेर काढण्याचे आव्हान आहे.