शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:41 IST

तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.वसमत तालुक्यातील मुख्य पीक असलेले हळद शेतकऱ्यांसाठी आधाराचे पीक ठरत आलेले आहे. राज्यात सर्वाधिक हळद पिकवणारा तालुका म्हणूनही वसमत प्रसिद्ध आहे. वसमतची उच्च दर्जाची हळद खरेदीसाठी राज्यभरातील हळद खरेदीदारांसह परप्रांतातील खरेदीदारही वसमत येथे येतात. वसमतच्या मोंढ्यात खरेदीदार मातब्बर उतरत असल्याने हळदीला दरही चांगला मिळतो. परिणामी शेतकरी हळद लागवडीवर भर देत गेले आहेत. मात्र आता पाणीटंचाईचे संकट समोर उभे राहीले आहे. गेल्या तीन वर्षांपासून धरण भरत नसल्याने हळदीला पाण्याचा फटका बसला आहे. ज्या शेतकºयांकडे पाण्याची व्यवस्था व हमखास पाणी आहे, असेच शेतकरी हळद लागवड करत आहेत.तालुक्यात यंदा १७ हजार ५०० हेक्टर हळद लागवड झालेली आहे. जूनमध्ये पावसाचा ताण पडला. पावसाळ्यातच पाण्याचा ताण पडल्याने इतर पिके वाºयावर सोडून शेतकºयांनी हळदीवर लक्ष केंद्रित केले. हळदीलाच पाणी वापरले. मात्र आता बोअर व विहिरींचेही पाणी कमी होत आहे. त्यामुळे हळदीवर चांगलाच ताण पडला आहे.अन् आता हळदीवर हुमणी व करपाचाही प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. हळदीवर पडलेल्या भुंग्यासाठी शेतकºयांनी एरंडीचे सापळेही लावले. रासायनिक औषधीही वापरली. या सर्व उपाययोजनांवर वेळ व पैसा खर्च झाला. आता हळदीवर काही भागात करपाही पहावयास मिळत आहे. या संकटावर मात करत आता हळदीला किती उतारा येतो, याची धास्ती शेतकºयांना आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव, पार्डी, सोमठाणा, कुरूंदा, कौठा, किन्होळा, सातेफळ, हयातनगर, परजना आदी भाग हळदीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. इसापूरच्या लाभक्षेत्रात पाण्याचा आधार असल्याने हळद काही प्रमाणात तग धरून आहे. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात हळदीला संघर्ष करावा लागतो आहे. फेब्रुवारी मार्चपर्यंत नवीन हळद येते. आता हळद काढणीच्या कामाला वेग येण्याचे दिसत आहेत. मात्र हळदीची अवस्था शेतकºयांना अस्वस्थ करणारी आहे. हळदीचा उतारा घटेलच मात्र हळदीच्या दर्जावरही परिणाम झाल्यास परत दर कमी मिळण्याची भीती; त्यामुळे दुहेरी फटक्याची चिंताही व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी