शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:41 IST

तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.वसमत तालुक्यातील मुख्य पीक असलेले हळद शेतकऱ्यांसाठी आधाराचे पीक ठरत आलेले आहे. राज्यात सर्वाधिक हळद पिकवणारा तालुका म्हणूनही वसमत प्रसिद्ध आहे. वसमतची उच्च दर्जाची हळद खरेदीसाठी राज्यभरातील हळद खरेदीदारांसह परप्रांतातील खरेदीदारही वसमत येथे येतात. वसमतच्या मोंढ्यात खरेदीदार मातब्बर उतरत असल्याने हळदीला दरही चांगला मिळतो. परिणामी शेतकरी हळद लागवडीवर भर देत गेले आहेत. मात्र आता पाणीटंचाईचे संकट समोर उभे राहीले आहे. गेल्या तीन वर्षांपासून धरण भरत नसल्याने हळदीला पाण्याचा फटका बसला आहे. ज्या शेतकºयांकडे पाण्याची व्यवस्था व हमखास पाणी आहे, असेच शेतकरी हळद लागवड करत आहेत.तालुक्यात यंदा १७ हजार ५०० हेक्टर हळद लागवड झालेली आहे. जूनमध्ये पावसाचा ताण पडला. पावसाळ्यातच पाण्याचा ताण पडल्याने इतर पिके वाºयावर सोडून शेतकºयांनी हळदीवर लक्ष केंद्रित केले. हळदीलाच पाणी वापरले. मात्र आता बोअर व विहिरींचेही पाणी कमी होत आहे. त्यामुळे हळदीवर चांगलाच ताण पडला आहे.अन् आता हळदीवर हुमणी व करपाचाही प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. हळदीवर पडलेल्या भुंग्यासाठी शेतकºयांनी एरंडीचे सापळेही लावले. रासायनिक औषधीही वापरली. या सर्व उपाययोजनांवर वेळ व पैसा खर्च झाला. आता हळदीवर काही भागात करपाही पहावयास मिळत आहे. या संकटावर मात करत आता हळदीला किती उतारा येतो, याची धास्ती शेतकºयांना आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव, पार्डी, सोमठाणा, कुरूंदा, कौठा, किन्होळा, सातेफळ, हयातनगर, परजना आदी भाग हळदीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. इसापूरच्या लाभक्षेत्रात पाण्याचा आधार असल्याने हळद काही प्रमाणात तग धरून आहे. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात हळदीला संघर्ष करावा लागतो आहे. फेब्रुवारी मार्चपर्यंत नवीन हळद येते. आता हळद काढणीच्या कामाला वेग येण्याचे दिसत आहेत. मात्र हळदीची अवस्था शेतकºयांना अस्वस्थ करणारी आहे. हळदीचा उतारा घटेलच मात्र हळदीच्या दर्जावरही परिणाम झाल्यास परत दर कमी मिळण्याची भीती; त्यामुळे दुहेरी फटक्याची चिंताही व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी