शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

येत्या तीन दिवसांत वॉर्डचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:33 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर बनविलेल्या वॉर्डाची साफसफाई सुरु असून बुधवारपासून १ आणि ३ नंबर वार्ड तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने अनेक रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होण्यास मदत मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर बनविलेल्या वॉर्डाची साफसफाई सुरु असून बुधवारपासून १ आणि ३ नंबर वार्ड तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने अनेक रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होण्यास मदत मिळणार आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसºया मजल्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु होते. शिवाय, या ठिकाणी औषधीही रुग्णांना बाहेरुन आणावी लागत आहे. यासह अनेक अडचणींचा करावा लागणारा सामना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालयाची झाडाझडतीच घेतली होती. यात आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी ठरावीक कालावधीही ठरवून दिला होता. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे रेंगाळत चाललेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे काम गतीने करण्यासाठी खडसावले होते. एवढेच काय तर शहर पोलीस ठाण्यात काम पूर्ण करण्याची तारीखही लिहून देण्यास सांगितले होते. त्यामुळे का होईना पण इमारतीचे जवळपास काम ९० टक्के झाले असल्याने आता रुग्णालय २०० बेडचे होणार आहे. रुग्णालयातील इतर प्रश्न सुटले असले तरीही अजून औषधीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरुन औषधी आणण्यासाठी धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. मात्र वर्षानुवर्षाचा खाटेचा प्रश्न तरी सुटणार आहे. एका- एका खाटेवर दोन- दोन रुग्णांना उपचार घेण्याची वेळ तूर्तास टळण्यास मदत होणार आहे. प्रारंभी १ व ३ वॉर्ड हलविला जाणार आहे. तर डॉक्टरांचाही तपासणी कक्ष दुसºयाच मजल्यावर बनविण्यात आला आहे. मात्र येथे अजून लिफ्टची व्यवस्थाच करण्यात आलेली नसल्याने अपंग रुग्णांना पायºया चढता - चढता नाकीनऊ येण्याची शक्यता आहे. शिवाय औषधीसाठीही खालीच धाव घ्यावी लागणार आहे.समस्यांवर लक्ष : डायलिसिस वॉर्डही हलणारविविध समस्यांने जिल्हा सामान्य रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घातले असल्याने, यंत्रणा समस्या सोडविण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र अधून - मधून काही केल्या येथील पाणी समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनापाण्यासाठी हॉटेलचा आधार घ्यावा लागतोे. तेथेही फुकट पाणी नसून काही पदार्थ खरेदी केले तर पाणी मिळते. याकडेही एकदा जिल्हाधिकाºयांनी लक्ष दिले तर तोदेखील प्रश्न मार्गी लागू शकतो, असे येथील पाण्यासाठी हैराण झालेले रुग्ण सांगत आहेत.रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याचा प्रयत्न रुग्णालयातर्फे सुरु आहे. तर पाण्याच्या समस्येकडे स्वत: लक्ष घालत असल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक मंगेश टेहरे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीdocterडॉक्टर