शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

वाळूघाट लिलाव; प्रतीक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:19 IST

वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया न्यायालय निर्णयानंतर ठप्प झाली आहे. आता १२ डिसेंबरला यात उच्च न्यायालायाचा निर्णय येण्याची शक्यता असून त्यानंतरच लिलावाचे भवितव्य ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया न्यायालय निर्णयानंतर ठप्प झाली आहे. आता १२ डिसेंबरला यात उच्च न्यायालायाचा निर्णय येण्याची शक्यता असून त्यानंतरच लिलावाचे भवितव्य ठरणार आहे.मागील दोन वर्षांपासून वाळू घाट लिलावात काही ना काही बाधा येत आहे. त्यातच गतवर्षी वाळूचा प्रतिब्रास दर आधीच चार हजारांच्या घरात गेलेला असल्याने कंत्राटदारांनी या लिलावाकडे पाठ फिरविली होती. तर कमी किमतीचे काही ठरावीक घाट लिलावात गेले होते. मात्र त्यातून जिल्ह्याची गरज पूर्ण होईल, अशी स्थिती नव्हती. त्यामुळे वाळूचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महसूल प्रशासनाने काही प्रमाणात मुसक्या आवळल्या असल्या तरीही आता बड्या माफियांनी यातून अंग काढून घेतले अन् नवीन छोटे माफिया फॉर्ममध्ये आल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर तर जणू रानच मोकळे झाल्यासारखी स्थिती आहे. एकीकडे वाळूघाट लिलाव उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठप्प आहेत. तर दुसरीकडे अवैध वाळू उपसा करणारे जोमात आले आहेत. थंडीचे दिवस असल्याने त्याचा फायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनी एकेकाळी वाळूचोरी रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र आता ही सगळीच यंत्रणा थंडीसोबतच थंड पडल्याचे दिसत आहे.रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील बहुतांश भागात वाळूची चोरटी वाहतूक रंगात येत आहे. काही दिवसांपूर्वी औंढ्यात अशीच वाहतूक रोखताना एका तलाठ्यालाही मारहाण झाली होती. त्यानंतर मात्र कोणी धाडस करताना दिसत नाही. त्यामुळे वाळू माफिया पुढील लिलावापर्यंत सगळेच घाट रिकामे करतील, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात एकूण ७२ घाट असून त्यापैकी जवळपास २८ घाटांची लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या होत्या. यंदा वाळूचे दरही बाराशे ते चौदाशे रुपये ब्रासच्या दरम्यान राहणार होते. त्यामुळे यावर्षी लिलावानंतर वाळूचे दरही कमी झाले असते. मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीच्या वाळूचे दरही गगनाला भिडलेले आहेत. ३0 ते ४0 हजारांदरम्यान एका फेरीचे दर मोजावे लागत आहेत. ट्रॅक्टरच्या वाहतुकीचेही दर वाढलेलेच आहेत. वाहन पकडल्यास आम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो, असे सांगितले जाते.मागील काही दिवसांपासून ठप्प असलेली अनेक कामे आता सुरू झाल्याचे दिसत आहे. ही कामे अवैध वाळू वाहतुकीच्या भरवशावरच सुरू झाली आहेत. प्रशासनाची पथके मात्र गायब असल्याने तूर्त ही कामे सुरू झाली आहेत. मात्र पथके कार्यान्वित झाल्यास अवघड होणार आहे.सध्या वाळू घाट लिलाव झालेले नसल्याचा सर्वाधिक फटका शासकीय कामे करणाºयांना बसत आहे. त्यांना अवैध वाळू घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली