शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

ग्रामसामाजिक परिवर्तन मनरेगातच अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:18 IST

ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेतील गावांना इतर योजनांतून कोणताच आधार नाही. त्यामुळे केवळ मनरेगावर भिस्त असलेल्या या गावांत फारसी कामे होताना दिसत नाहीत. कामेच नसतील तर कोणते परिवर्तन होणार, हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेतील गावांना इतर योजनांतून कोणताच आधार नाही. त्यामुळे केवळ मनरेगावर भिस्त असलेल्या या गावांत फारसी कामे होताना दिसत नाहीत. कामेच नसतील तर कोणते परिवर्तन होणार, हा प्रश्नच आहे.हिंगोली जिल्ह्यात ग्रामसामाजिक परिवर्तन योजनेतून दहा गावांची निवड केलेली आहे. आधी केवळ सेनगाव तालुक्याचीच यात निवड केलेली होती. नंतर इतर तालुक्यांतही यातून कामे करण्यासाठी गावांची निवड करण्यात आली.सेनगाव तालुक्यातील गोंडाळा, खिल्लार, जामदया, लिंगदरी, जामठी, सूरजखेडा या गावांचा समावेश आहे. तर औंढा तालुक्यातील देवाळा तुर्क पिंपरी, सावळी बहिनोबा, हिंगोली तालुक्यातील जांभरुन तांडा, जांभरुण आंध या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांची लोकसंख्या ७३३४ असून यापैकी २३३९ जणांकडे जॉबकार्ड आहे. मागील तीन वर्षांत या गावांमध्ये ५६.९७ लाखांचा खर्च झाला आहे. यात सर्वाधिक खर्च झालेले गाव खिल्लार आहे.तेथे ११.३१ लाख खर्च झाला. तर जांभरुण आंधला १0.१५ लाखांचा खर्च झाला आहे.आता या सर्व गावांमध्ये १८२२ कामे करण्याचे नियोजन केले आहे. मजूर आहेत, कामे आहेत. मात्र त्यावर कोणी हजेरी लावत नसल्याने ही कामे नुसती नियोजनातच आहेत. या योजनेतील ही गावे असल्याने येथे वेगळेपण जपून कामे सुरू करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यात गोंडाळा १९४, खिल्लार-१४९, जामदया-१४९, लिंगदरी-१२२, जामठी ७१0, सूरजखेडा ७७, जांभरुण तांडा १९४ तर जांभरुण आंधला २३७ कामांचे नियोजन आहे. उर्वरित २ गावांतही ४३१ कामांचे नियोजन करण्यात आल्याचे औंढा तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या योजनेत योग्य नियोजन करून कामे करण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही सूचना दिल्या होत्या. मात्र आता निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने नियमित कामांचीच अंमलबजावणी नसल्याने या कामांना तर खो दिल्याचेच चित्र आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली