शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ग्रामसामाजिक परिवर्तन मनरेगातच अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:18 IST

ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेतील गावांना इतर योजनांतून कोणताच आधार नाही. त्यामुळे केवळ मनरेगावर भिस्त असलेल्या या गावांत फारसी कामे होताना दिसत नाहीत. कामेच नसतील तर कोणते परिवर्तन होणार, हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेतील गावांना इतर योजनांतून कोणताच आधार नाही. त्यामुळे केवळ मनरेगावर भिस्त असलेल्या या गावांत फारसी कामे होताना दिसत नाहीत. कामेच नसतील तर कोणते परिवर्तन होणार, हा प्रश्नच आहे.हिंगोली जिल्ह्यात ग्रामसामाजिक परिवर्तन योजनेतून दहा गावांची निवड केलेली आहे. आधी केवळ सेनगाव तालुक्याचीच यात निवड केलेली होती. नंतर इतर तालुक्यांतही यातून कामे करण्यासाठी गावांची निवड करण्यात आली.सेनगाव तालुक्यातील गोंडाळा, खिल्लार, जामदया, लिंगदरी, जामठी, सूरजखेडा या गावांचा समावेश आहे. तर औंढा तालुक्यातील देवाळा तुर्क पिंपरी, सावळी बहिनोबा, हिंगोली तालुक्यातील जांभरुन तांडा, जांभरुण आंध या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांची लोकसंख्या ७३३४ असून यापैकी २३३९ जणांकडे जॉबकार्ड आहे. मागील तीन वर्षांत या गावांमध्ये ५६.९७ लाखांचा खर्च झाला आहे. यात सर्वाधिक खर्च झालेले गाव खिल्लार आहे.तेथे ११.३१ लाख खर्च झाला. तर जांभरुण आंधला १0.१५ लाखांचा खर्च झाला आहे.आता या सर्व गावांमध्ये १८२२ कामे करण्याचे नियोजन केले आहे. मजूर आहेत, कामे आहेत. मात्र त्यावर कोणी हजेरी लावत नसल्याने ही कामे नुसती नियोजनातच आहेत. या योजनेतील ही गावे असल्याने येथे वेगळेपण जपून कामे सुरू करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यात गोंडाळा १९४, खिल्लार-१४९, जामदया-१४९, लिंगदरी-१२२, जामठी ७१0, सूरजखेडा ७७, जांभरुण तांडा १९४ तर जांभरुण आंधला २३७ कामांचे नियोजन आहे. उर्वरित २ गावांतही ४३१ कामांचे नियोजन करण्यात आल्याचे औंढा तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या योजनेत योग्य नियोजन करून कामे करण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही सूचना दिल्या होत्या. मात्र आता निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने नियमित कामांचीच अंमलबजावणी नसल्याने या कामांना तर खो दिल्याचेच चित्र आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली