शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Video: विक्रेत्याने चक्क नालीच्या पाण्याने धुतल्या भुईमूग शेंगा, काय म्हणावे अशा प्रवृत्तीला?

By विजय पाटील | Updated: August 19, 2023 16:17 IST

आता तुम्हीच सांगा? कशा खाव्यात भुईमूग शेंगा

हिंगोली: पाणी व कोरभर भाकर द्या म्हटले तर कोणी नाही म्हणत नाही. पण असे काही माणसे असतात की जे दुष्ट प्रवृत्तीला बाजुला न करता आपला चेहरा जगासमोर आणतात. चक्क नालीचे पाणी घेऊन भुईमुगाच्या शेंगा धुन्याचा  प्रकार वसमत शहरात घडला आहे.

वसमत शहर पोलीस ठाण्याच्या बाजुला दररोजच भाजीपाला व फळ विक्रेते आपल्या उदरनिर्वाहासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. काहीजण नालीच्या बाजूला तर काहीजण नाली नसलेल्या बाजूला भाजीपाला मांडतात. मोठ्या विश्वासाने शहर व परिसरातील नागरिक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या भाजीपाला विक्रेत्याकडून भाजीपाला विकत घेतात. परंतु ही मंडळी नालीच्या पाण्यातून भुईमुगाच्या शेंगा दूध असतील तर यांच्याकडून इतर भाजीपाला कसा घ्यावा असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. ग्रामीण भागातून आलेला भाजीपाला स्वच्छ व ताजा असतो हा विश्वास आज पर्यंत शहरातील लोकांना होता. पण नालीच्या पाण्याने शेंगा धुतल्यामुळे हा विश्वास कमी झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दोघांनी पोलीस ठाण्यासमोर भाजीपाल्याचा गाडा लावला. नंतर दोघांपैकी एकाने पोलीस ठाण्यासमोरील नालीतून वाहणारे पाणी पांढरे पातेल्यात घेऊन चक्क भुईमुगाच्या शेंगा धुऊन काढल्या आणि समोर असलेल्या गाड्यावर टाकल्या. हा प्रकार जर ही मंडळी रोज करीत असतील तर भुईमुगाच्या शेंगा खाव्या तरी कशा असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

भाजीपाला ही नाल्याच्या पाण्याने धुतला ...?या दोन विक्रेत्यांनी भुईमुगाच्या शेंगा नालीच्या पाण्याने धुतल्या हे सत्य आहे. जर भुईमुगाच्या शेंगा या दोन व्यक्ती नालीच्या पाण्याने धुत असतील तर भाजीपालाही  रोजच्या रोज नालीच्या पाण्याने धुत असतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.- निलेश इंगोले, नागरीक.

टॅग्स :MarketबाजारHingoliहिंगोली