शहरं
Join us  
Trending Stories
1
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
2
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
3
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
4
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
5
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
6
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
7
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
8
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
9
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
10
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
11
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
12
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
13
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
14
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
15
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
16
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
18
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
19
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
20
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
Daily Top 2Weekly Top 5

औंढा नागनाथ विश्वस्थांच्या बैठकीत विविध ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:20 IST

फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सव ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थानचे विश्वस्थ व सल्लागार मंडळाच्या बैठकीत उत्सवाच्या अनुषंगाने मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, भाविकांच्या प्राथमिक गरजांवर आधारित उपाययोजना करण्याचा निर्णय मंडळातर्फे घेतला आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, गरीब कुटूंबांनाही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेत गरीब कुटुंबातील मुलींचे सामूहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्याचा निर्णय आ.डॉ. संतोष टारफे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला. यंदा नागरिकांच्या सूचनेनुसार व त्यांच्याच सहकार्यातून महोत्सव पार पाडण्याची भूमिका मंदिर प्रशासनाने घेतल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले. तर काही सुचविलेल्या सूचनाही संस्थानच्या वतीने मान्य केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील, उपाध्यक्षा अलका गणेश कुरवाडे, पोनि कुंदनकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाशिमकर, विश्वस्थ डॉ. किशन लखमावार, डॉ.पुरूषोत्तम देव, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, गजानन वाखरकर, विद्याताई पवार, गणेश देशमुख, डॉ. देविदास कदम, आनंद निलावार, डॉ. देविदास खरात, महेश बियाणी, रमेश बगडिया, अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, पंजाब गव्हाण, शरद पाटील, शिवाजी देशपांडे, श्रीपाद दीक्षित, अनिल देव, विजय महामुने, रामराव पाटील, मोतीराम राठोड, सुरेश गिरी, नागनाथ रेणके, नंदकुमार पाटील, वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे, बापूराव देशमुख यांची उपस्थिती होती.समित्या स्थापन : बंदोबस्तही ठेवणारसात दिवस चालणाºया यात्रा महोत्सव काळात भाविकांची गर्दी मोठी असल्याने या काळात गावकºयांच्या मदतीने हा उत्सव पार पाडण्यासाठी आरोग्य समिती, आर्थिक व्यवहार, देखरेख समिती, भोजन समिती, धार्मिक कार्यक्रम समिती, दर्शन व्यवस्था अशा विविध समित्या स्थापन करून यावर नागरिकांच्या नियुक्त्याकेल्या आहेत. तसेच हा उत्सवात ग्रामस्थांनी आपल्या गावाचा उत्सव आहे, असे समजून शांततेत पार पाडण्याचे आवाहन आ.डॉ. संतोष टारफे यांनी केले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी महोत्सवा दरम्यान येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.