शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

औंढा नागनाथ विश्वस्थांच्या बैठकीत विविध ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:20 IST

फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सव ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थानचे विश्वस्थ व सल्लागार मंडळाच्या बैठकीत उत्सवाच्या अनुषंगाने मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, भाविकांच्या प्राथमिक गरजांवर आधारित उपाययोजना करण्याचा निर्णय मंडळातर्फे घेतला आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, गरीब कुटूंबांनाही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेत गरीब कुटुंबातील मुलींचे सामूहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्याचा निर्णय आ.डॉ. संतोष टारफे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला. यंदा नागरिकांच्या सूचनेनुसार व त्यांच्याच सहकार्यातून महोत्सव पार पाडण्याची भूमिका मंदिर प्रशासनाने घेतल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले. तर काही सुचविलेल्या सूचनाही संस्थानच्या वतीने मान्य केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील, उपाध्यक्षा अलका गणेश कुरवाडे, पोनि कुंदनकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाशिमकर, विश्वस्थ डॉ. किशन लखमावार, डॉ.पुरूषोत्तम देव, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, गजानन वाखरकर, विद्याताई पवार, गणेश देशमुख, डॉ. देविदास कदम, आनंद निलावार, डॉ. देविदास खरात, महेश बियाणी, रमेश बगडिया, अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, पंजाब गव्हाण, शरद पाटील, शिवाजी देशपांडे, श्रीपाद दीक्षित, अनिल देव, विजय महामुने, रामराव पाटील, मोतीराम राठोड, सुरेश गिरी, नागनाथ रेणके, नंदकुमार पाटील, वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे, बापूराव देशमुख यांची उपस्थिती होती.समित्या स्थापन : बंदोबस्तही ठेवणारसात दिवस चालणाºया यात्रा महोत्सव काळात भाविकांची गर्दी मोठी असल्याने या काळात गावकºयांच्या मदतीने हा उत्सव पार पाडण्यासाठी आरोग्य समिती, आर्थिक व्यवहार, देखरेख समिती, भोजन समिती, धार्मिक कार्यक्रम समिती, दर्शन व्यवस्था अशा विविध समित्या स्थापन करून यावर नागरिकांच्या नियुक्त्याकेल्या आहेत. तसेच हा उत्सवात ग्रामस्थांनी आपल्या गावाचा उत्सव आहे, असे समजून शांततेत पार पाडण्याचे आवाहन आ.डॉ. संतोष टारफे यांनी केले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी महोत्सवा दरम्यान येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.