शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:59 IST

महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्या अनुषंगाने वर्दळीत बाजाराच्या ठिकाणी महावितरणच्या वीजतारांचा गुंता सर्वांनाच माहित आहे. अनेकदा वीजतारांचे घर्षण होऊन आगीच्या दुर्घटना घडतात. शिवाय पावसामुळेही वारंवार बिघाड होतो. आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत खांबावरील वीजतारा नागरिकांना दिसणार नाहीत. हिंगोली शहर सुशोभिकरणच्या दृष्टिकोनातून व गर्दीच्या ठिकाणी वीजतारा उघड्या राहू नयेत, यासाठी आता हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे येत्या पंधरा दिवसांत सुरू केले जाणार आहे. सदर कामासाठी लागणारी परवानगी, सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. तसेच महावितरण व नगरपालिका हे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करणार आहे.महावितरणच्या ग्राहकांना वीजबील दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रियाआॅनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून सदर तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. शिवाय याबाबत वीजग्राहकांना एसएमएसही पाठविण्यात येईल.ग्राहकांना वीज बिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल अ‍ॅप, ईमेल व ट्विटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहे.वीजपुरवठा सुरळीतसाठी विद्युत उपकेंद्र; ३ कोटी खर्च४हिंगोली शहरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरठा खंडितपासून हिंगोलीकरांची लवकरच सुटका होणार आहे. शहरात वीजपुवठा सुरळीत व्हावा यासाठी आता महावितरणने नवीन ३३ के व्ही विद्युत उपकेंद्र उभारले आहे. नवीन खाकीबाबा सबस्टेशनची काम पूर्ण झाले आहे. रेल्वे पटरीच्या पलीकडील विजेचा दाब आता कमी आदर्श महाविद्यालयाजवळील उपकेंद्रावर असेल. तर रेल्वेपटरी अलीकडील शहराचा भाग महावितरणच्या कार्यालयातील खाकीबाबा ३३ केव्ही उपकेंद्रावर राहणार आहे. ३ कोटी रूपये खर्च करून सबस्टेशनचे कामकाज करण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण