शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कळमनुरीत ७५ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:51 IST

तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे.मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाळा सुरु असूनही पाणीटंचाई कायम आहे. सध्या ६६ गावांत ९३ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीला आलेले आहेत. त्यापैकी ३७ प्रस्तावांना तहसिलदारांची मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ९ गावांत ८ टँकरने पाणीपुरवठा उन्हाळ्यात केला. १५ दिवसांपूर्वी दोन दमदार पाऊस पडले. त्यामुळे सध्या या गावात टँकर बंद करण्यात आले आहेत. पाणबुडी वस्ती, माळधावंडा, शिवणी र्खु, हातमाली, रामवाडी, महालिंगी तांडा, मसोड, कुपटी या गावांना उन्हाळाभर टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तालुक्याचा साडेचार कोटीची संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रशासनाने मंजूर केला आहे. पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याचे चित्र आहे.पेरणीतही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अजूनही विहीरी हातपंप कोरडेठाक पडले आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरीकांची वणवण भटकंती सुरु आहे. १५ जूनपासून शाळा सुरु झाल्या असून अनेक शाळांतही पाण्याची टंचाई जाणवत आहे. ९ गावात पुन्हा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई