शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जनसुविधेत दोनशेवर प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:40 IST

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत जनसुविधा योजनेतील विविध कामांचे दोनशेवर प्रस्ताव आता जिल्हा नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. ते प्रस्ताव पालकमंत्र्यांकडून अंतिम होणार असले तरीही त्याला विलंब लागू नये म्हणून जि.प.सदस्य खेटे घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत जनसुविधा योजनेतील विविध कामांचे दोनशेवर प्रस्ताव आता जिल्हा नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. ते प्रस्ताव पालकमंत्र्यांकडून अंतिम होणार असले तरीही त्याला विलंब लागू नये म्हणून जि.प.सदस्य खेटे घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.जनसुविधा योजनेत ग्रामपंचायतींना स्मशानभूमिच्या विकासासह विविध कामांसाठी निधी दिला जातो. संरक्षक भिंत, रस्ता, शेड, विद्युतीकरण आदी कामे करता येतात. यामध्ये नियोजन समितीवरील सदस्यांनी शिफारस केलेल्या कामांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी जि.प.सदस्य आक्रमक होते. यामध्ये आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्याच शिफारसींना जास्त भाव मिळतो, अशी त्यांची तक्रार होती. तर पूर्वी या कामांच्या शिफारसी केवळ जि.प. पदाधिकारी व समितीवरील सदस्यच करीत. तीच कामे मंजूर व्हायची.यावेळी जि.प.ला या योजनेत जवळपास ३.६0 कोटी रुपयांचा निधी आहे. यापैकी ३0 लाखांचे जुने दायित्व बाकी आहे. त्यामुळे ३.३0 कोटी रुपये नियोजनासाठी उपलब्ध आहेत. यात दीडपट नियोजन झाल्यास पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कामांचे नियोजन करणे शक्य आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय होतो, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. असे असले तरीही जि.प.कडून जवळपास २२५ गावांतील कामांचे प्रस्ताव शिफारसीसह नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे यातील पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी गावांना निधी मिळणार आहे. निधीच्या तुलनेत प्रस्ताव जास्त असल्याने सदस्य आपल्याच भागातील कामे होण्यासाठी रेटा लावतील, अशी चिन्हे असून अनेकांनी नियोजन विभागाच्या घिरट्या मारणे सुरू केले आहे.तेथे गेल्यावर हे प्रस्ताव पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यासमोर गेल्याशिवाय मंजुरी मिळणार नसल्याचे समजताच अनेकांचा हिरमोड होत आहे. काहींनी तर यासाठी चक्क पालकमंत्र्यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला.यंदा कामे वेळेत मंजूर व्हावीत, यासाठी जि.प.सदस्य आटापिटा करीत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबरनंतर लोकसभेचे वातावरण गरम होणार आहे. शिवाय त्यानंतर आचारसंहिता लागल्यास मार्च एण्डपर्यंत कोणतेच काम होणार नाही. त्यामुळे तत्पूर्वीच या सर्व कामांचे नियोजन, निविदा व कार्यारंभ आदेशहे निवडणुकीपूर्वी मिळतील, याची खबरदारी घेतली जात आहे. कोणती गावे निवडली जातील, याचा अजूनही मेळ नसल्याने सदस्यांमध्ये चलबिचल आहे. आगामी निवडणुकीतही ही कामे केल्याचा फायदा घेता यावा, यासाठी जोर लावला जात आहे.जनसुविधा योजनेत आहे तेवढ्याच निधीचे नियोजन केले जाते की, दीडपट केले जाते? याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. दीडपट होणार असेल तर आमच्याही प्रस्तावाचे बघा, म्हणणारे वाढले आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद