शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

सामाजिक समता रुजविण्याचा प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:32 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले. सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ८ एप्रिल रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले. सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ८ एप्रिल रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात केले.येथील सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन आ. मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, जात पडताळणी उपायुक्त भारत केंद्रे, जात पडताळणी समिती सदस्य सचिव छाया कुलाल, दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर, बबन मोरे, बबन शिखरे, दत्ताराव पाटोळे आणि समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण उपस्थित होते. मुटकुळे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणे व गांभीर्याने नमूद केली आहे. कलम ४६ मध्ये ‘राज्य हे दुर्बल तर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्यायावर सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे सरंक्षण करील’ असे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना समानतेचा हक्क प्राप्त करुन दिला असे ते म्हणाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, बबन शिखरे, डॉ. विजय निलावार यांनीही मार्गदर्शन केले. समाज कल्याण सहायक आयुक्त चव्हाण म्हणाले राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असून, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत अधिकाराची जाणीव असणे आवयश्यक आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन इंगोले यांनी केले. आभार वागतकर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी नागरिक उपस्थिती होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूतां तर्फे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.समाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समतादूतांकडून सप्ताहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक वाटचाल डीव्हीडी महाविद्यालयात दाखविण्यात येणार आहे. महिलांसाठी (हिंदू कोड बिल) व शेतकºयांसाठीचे योगदान यासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सप्ताहामध्ये जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल्ल पट्टेबहादूर, शंकर पोघे, सुकेश कांबळे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक