शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ओळखपत्र दाखविले तरच प्रवास; सर्वसामान्य पडले पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

हिंगोली : कोरोना महामारीचे वाढते रुग्ण पाहता शासनाने एस. टी. प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. शुक्रवारी हिंगोली स्थानकातून ...

हिंगोली : कोरोना महामारीचे वाढते रुग्ण पाहता शासनाने एस. टी. प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. शुक्रवारी हिंगोली स्थानकातून परजिल्ह्यांत जाणाऱ्या बसेसमधील २२ प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना प्रवासास परवानगी दिल्याची माहिती स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.

कोरोना महामारीचा धोका ओळखून हिंगोली आगारातून शुक्रवारी एकही बस सोडण्यात आली नाही. बसस्थानकातून परजिल्ह्यांत जाणाऱ्या दोन बसेस होत्या. त्यामध्ये नांदेड व पुसद येथील बसेसचा समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही काहीजण काम नसतानाही विनाकारण प्रवास करताना आढळून येत आहेत. हे पाहून शासनाने शक्कल लढवत प्रवासादरम्यान प्रवाशांना ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. एवढेच नाही तर प्रवाशांच्या उजव्या किंवा डाव्या हातावर क्वारंटाईन शिक्काही मारला जाणार आहे तसेच प्रवाशांची अँटिजेन तपासणीही केली करावी, असे महामंडळास परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

काही प्रवासी बसस्थानकावरील ॲंटीजेन तपासणीच्या भीतीपोटी जवळच्या थांब्यावर उतरत आहेत. त्यामुळे आता शहराच्या ठिकाणी दोनच थांबे राहणार आहेत. चालक, वाहकाने प्रवाशाच्या विनंतीवरून बस थांबविल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असेही पत्रकात नमूद केले आहे.

शाईसाठी पाठविले पत्र...

प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का मारायचा आहे; परंतु पहिल्याच दिवशी शिक्यासाठी शाई उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या हातावर शिक्का मारता आला नाही. याबाबत महामंडळाने शाई उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. शाई उपलब्ध झाल्यास लगेच अंमलबजावणी केली जाईल, असे महामंडळाने सांगितले.