शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर वॉर्ड क्र. १ बरकतपुरा येथील नाल्या कचऱ्यांनी भरून ...

नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर वॉर्ड क्र. १ बरकतपुरा येथील नाल्या कचऱ्यांनी भरून गेल्या आहेत. त्यामुळे नाल्यांतील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. ग्रामपंचायतने वेळीच याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरींना भरपूर प्रमाणात असतानाही वीज गायब होत असल्याने पाणी पिकांना देता येत नाही. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन आखाडा बाळापूर व परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त

सवना: सेनगाव तालुक्यातील सवना ते ब्राह्मणवाडा या चार किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे वाहनचालक कमालीचे वैतागले आहेत. वरिष्ठांनी याची दखल घेऊन सवना ते ब्राह्मणवाडा हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

भुईमूग पिकावर रानडुकरांचा ताव

सवना : सेनगाव तालुक्यातील चोंडी, सवनावाडी, सुरजखेडा आदी शेतशिवारात शेतकऱ्यांनी भुईमुगाचा मोठ्या प्रमाणात पेरा केला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रानडुकरे व इतर वन्य प्राणी शेतात येऊन भुईमूग व इतर पिकांची नासाडी करीत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे अनेक वेळा केली आहे. परंतु, अद्याप तरी वन विभागाने लक्ष दिले नाही. रानडुकरासह इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नळाचे पाणी वेळेवर सोडण्याची मागणी

कळमनुरी: शहरातील गणेशनगर, सहयोगनगर, ब्राह्मणगल्ली, पाटील गल्ली, शास्त्रीनगर, विकासनगर, आठवडी बाजार, इंदिरानगर आदी नगरामध्ये नळाचे पाणी वेळेवर सोडण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याची वाट पहात बसावी लागते. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगण्यात आले. परंतु, कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही. नगर परिषदेच्या वरिष्ठांनी लक्ष देउन नळाला पाणी वेळवर सोडण्याची सूचना द्यावी, अशी मागणी नागिरकांनी केली आहे.

बसस्थानकात कचऱ्याची ढिगारे

कळमनुरी: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. ढिगावरील कुजलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आगारप्रमुखांनी प्रवाशांनी मागणी लक्षात घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.