शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शेती ? छे ! पाच एकरात उभारला ड्रीम प्रोजेक्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:10 IST

यशकथा : तरुण शेतकऱ्याने पाच एकर शेती पूर्णपणे व्यवसायासाठी वापरण्याच्या उद्देशाने वेगवेगळे तीन व्यवसाय सुरू करून आपला ड्रीम प्रोजेक्ट उभा केला आहे.

- विश्वास साळुंके ( वारंगा फाटा, हिंगोली )

पारंपरिक शेतीला फाटा देऊन कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील तरुण शेतकऱ्याने पाच एकर शेती पूर्णपणे व्यवसायासाठी वापरण्याच्या उद्देशाने वेगवेगळे तीन व्यवसाय सुरू करून आपला ड्रीम प्रोजेक्ट उभा केला आहे. पारंपरिक शेती करीत असताना अनेकदा उत्पन्न कमी खर्च अधिक, अशी स्थिती होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील गजानन मारोती उदगिरे या ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतीतच ड्रीम प्रोजेक्ट उभा करण्याची आस घेतली.

शेती ही शेतीच न ठेवता तिचा पूर्णपणे व्यवसायाकरिता वापर करून विविध व्यवसाय चालू करण्याचा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला. कुटुंबियांनीदेखील त्यास संमती दर्शविली आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. सर्वप्रथम गजानन यांनी गावरान १५ शेळ्या ९० हजार रुपयांना विकत घेतल्या व बारा हजार रुपयांत उस्मानाबादी जातीचे बोकड विकत आणले.  केवळ शेळीपालनावर न थांबता गावरानी कोंबड्यांचे कुक्कुटपालन करण्यासाठी त्यांनी २०० रुपये प्रतिपिल्लू याप्रमाणे दहा हजार रुपयांची ५० गावरान कोंबड्यांची पिल्लं खरेदी केली आणि शेळीपालन व कुक्कुटपालन सुरू केले. ५० बाय ३२ फुटांचे पत्र्यांचे शेड उभारण्यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला.

सुरुवातीला त्यांनी शेळ्या व कोंबड्यांची पिल्लं खरेदी केल्यानंतर त्यातच शेळ्यांनी दिलेली पिल्लं व कोंबडीच्या अंड्यांपासून तयार केलेली पिल्लं यांची वाढ केली. सुरुवातीपासून कुठलीही खरेदी केली नसल्याचे गजानन उदगिरे यांनी सांगितले. शेळ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी शेतात रासायनिक खताचा वापर बंद करून संपूर्ण शेतात शेळ्यांच्या लेंडीखताचा वापर सुरू केला. परिणामी त्यांचे दरवर्षी रासायनिक खतासाठी  लागणारे लाखो रुपये वाचले. त्यांना एकूण पाच एकर जमीन असून, दोन एकरात ऊस आहे. ऊस गेल्यानंतर संपूर्ण शेती ही शेळ्यांसाठी लागणाऱ्या चाऱ्याकरिता वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या व्यवसायाबरोबर शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून १५ गुंठ्यांत शेततळे तयार केले. त्यामध्ये पाणी भरून घेतल्यानंतर त्यांनी ५ हजार नग मत्स्यबीज सोडले. त्यासाठी तीन हजार रुपये खर्च आला. आतापर्यंत शेळ्या, कोंबड्यांची पिल्लं, शेड, मत्स्यबीज व खाद्य यासाठी गजानन यांना चार लाख रुपये खर्च आला. यापुढे त्यांना अधिक खर्च लागणार नसून विक्रीस तयार असलेल्या १० बोकड, ४०० कोंबड्या व अंडे आणि मासळींपासून त्यांना पुढील दोन महिन्यात चार लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. आज रोजी २० शेळ्या, १८ बोकड, १८ शेळ्यांची पिल्लं, ४०० कोंबड्या आणि मासळी विक्रीसाठी तयार आहे. यापैकी १० बोकड विक्रीसाठी, कोंबडी, अंडी विक्रीसाठी उपलब्ध असून, गावरान अंड्यांना हिवाळ्यात चांगली मागणी असल्याने दररोज किमान ३०० रुपयांची नगदी स्वरुपात अंडी विक्री करतात. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी