शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हिंगोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 10:42 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत नगर परिषदेची थेट वीज तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली.

हिंगोली : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत नगर परिषदेची थेट वीज तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली.

मागील अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या वीजबिलापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित केला जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे १४ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये औंढा नागनाथ उपविभागातील ग्राहकांकडे २६ लाख, वसमतमध्ये ३ कोटी ६५ लाख, कळमनुरी ५ कोटी ५५ लाख, सेनगावमध्ये ४ कोटी १५ लाख तसेच हिंगोली ग्रामीण उपविभागाकडील ग्राहकांकडे ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर पथदिवे वीजग्राहकांकडे ७१ कोटी ८ लाख रुपये थकबाकी आहे. नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा वीजग्राहकांकडे डिसेंबर २०१७ अखेर १०६ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर परभणी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे २१ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

परिमंडळातील नांदेड, हिंगोली आणि परभणी तीन जिल्ह्यातील मिळुन ४७७. ७२ कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरण पुढे आहे. वीजबिल वसुलीसाठी पथक नेमले आहे.थकबाकीचा डोंगर :महावितरणसाठी डोकेदुखीपाणीपुरवठा आणि पथदिवे वीजग्राहकांकडील थकबाकी महावितरणसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असून थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढतच आहे. परिणामी, नाईलाजास्तव महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.नांदेड परिमंडळातील पाणीपुरवठा ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख तर, पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती देण्यात आली. ज्यांनी बिलभरणा केला नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.हिंगोली नगरपालिकेने ८ फेबु्रवारी रोजी १६ लाख रूपये भरले. मात्र उर्वरीत रक्कम भराणा बाकी आहे. त्यामुळे नगर परिषदेचा कधीही वीज तोडली जाईल, असे महावितरणने सांगितले.