शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:00 IST

जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औढा, वसमत सह केंद्रा बु., कडोळी, बाळापूर, नांदापूर, साटंबा, बासंबा, गोरेगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, खुडज, वारंगा फाटा, जवळा बाजार, तुप्पा, हट्टा, पिंपळदरी, जामगव्हाण आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औढा, वसमत सह केंद्रा बु., कडोळी, बाळापूर, नांदापूर, साटंबा, बासंबा, गोरेगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, खुडज, वारंगा फाटा, जवळा बाजार, तुप्पा, हट्टा, पिंपळदरी, जामगव्हाण आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.ेडोंगरकड्यात दमदारडोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात खरीप पिकांना दिलासा देणारा पाऊस झाला आहे. डोंगरकड्यासह परिसरातील भाटेगाव, वरुड, झुंझुंवाडी, देववाडी, चिंचवाडी, हिवरा, जामगव्हाण, सुकळीवीर आदी गावामध्ये ६ व ७ जुलैै रोजी झालेल्या जोरदार पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.पार्डीत दिलासापार्डी खु : वसमत तालुक्यातील पार्डी खु. परिसरातील कोठारी, कानोसा, कोठारवाडी या भागामध्ये १० ते १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सायंकाळी ५ पासून दमदार पावसाने हजेरी लावली. दोन दिवसात दमदार पाऊस पडत असून दिवसभर कडक ऊन तापत आहे.गेल्या आठवड्यामध्ये पिके सूकू लागली होती पण गेल्या दोन दिवसामध्ये पावसाच्या आगमनामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर गावालगत असलेल्या पाझर तलावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.हिंगोली शहर व परिसरातही दिवसभर कधी भुरभुर तर कधी पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी दहानंतर दिवसभर पावसाचा हा खेळ सुरू होती. रात्री साडेनऊच्या दरम्यान पाऊस थांबला होता.तब्बल १२ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. त्यानंतर काही शेतकºयांनी कोळपणी,वखरणी, निंदणी शेतातील कामे आटोपून पावसाची वाट शेतकरी अतूरतेने बघत होते. तीन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस चालू होता. या पावसाने शेतकºयामध्येसमाधानाचे वातावरण आहे. ७ जुलै रोजी सकाळी जिल्हाभरात अनेक गावात पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाने पीकांना जीवदान मिळाले असून खरीप पीके वाढीला लागले आहे. यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.केंद्रा बु. परिसरात पाच वर्षांत पहिल्यांदाच पूर४केंद्रा बु.- सेनगाव तालुक्यातील मागील पाच वर्षापासून पावसाचे प्रामण अत्यल्प होत होते. त्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच कोरडे पडत होते. यावर्षी ७ जुलै रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे केंद्रा बु. येथील नदीला मोठा पुर आला. पाच वर्षातील पहिलाच पुर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी नदी काठावर मोठी गर्दी केली होती.खरीपातील पिकांना चांगल्या पावसाची गरज होती. निसर्गाकडून शेतकºयांसाठी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. मागील पाच वर्षात या भागात शापीत पट्टा अशी अवस्था होती. परिसरातील ताकतोडा, कहाकर, वरखेडा, बटवाडी, केंद्रा खु., हिवरा, माहेरखेडा, वलाना, मन्नास पिंपरी, जामठी बु., गोंधनखेडा आदी सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्याची व हिरव्या चाºयाची समस्या मिटली आहे. केंद्रा बु. नदीवरील पुराच्या पाण्याने वृत्त लिहिण्यापर्यंत दोन तासापासून गोरेगाव- रिसोड मार्ग बंद झाला होता. पुलाची उंची वाढविण्यासाठी अनेकवेळा सा.बां. विभागाला सूचना देवूनही उपयोग होत नाही.कळमनुरी तालुक्यातही दमदार पाऊसशहर व परिसरात ७ जुलै रोजी दीड तेदोन तास दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. ६ जुलै पासून रिमझिम पाऊस पडत होता. ७ जुलै रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसाने छोटे नाले तुडूंब भरून वाहिले. तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस पडला. ७ जुलै रोजी दिवसभर पाऊस कमी जास्त सुरूच होता. शेतात पाणीच पाणी साचले होते. शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पिकांची वाढ झपाट्याने होणार आहे. पावसामुळे इसापूर धरणाचे पाणी वाढत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस