शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:00 IST

जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औढा, वसमत सह केंद्रा बु., कडोळी, बाळापूर, नांदापूर, साटंबा, बासंबा, गोरेगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, खुडज, वारंगा फाटा, जवळा बाजार, तुप्पा, हट्टा, पिंपळदरी, जामगव्हाण आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औढा, वसमत सह केंद्रा बु., कडोळी, बाळापूर, नांदापूर, साटंबा, बासंबा, गोरेगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, खुडज, वारंगा फाटा, जवळा बाजार, तुप्पा, हट्टा, पिंपळदरी, जामगव्हाण आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.ेडोंगरकड्यात दमदारडोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात खरीप पिकांना दिलासा देणारा पाऊस झाला आहे. डोंगरकड्यासह परिसरातील भाटेगाव, वरुड, झुंझुंवाडी, देववाडी, चिंचवाडी, हिवरा, जामगव्हाण, सुकळीवीर आदी गावामध्ये ६ व ७ जुलैै रोजी झालेल्या जोरदार पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.पार्डीत दिलासापार्डी खु : वसमत तालुक्यातील पार्डी खु. परिसरातील कोठारी, कानोसा, कोठारवाडी या भागामध्ये १० ते १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सायंकाळी ५ पासून दमदार पावसाने हजेरी लावली. दोन दिवसात दमदार पाऊस पडत असून दिवसभर कडक ऊन तापत आहे.गेल्या आठवड्यामध्ये पिके सूकू लागली होती पण गेल्या दोन दिवसामध्ये पावसाच्या आगमनामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर गावालगत असलेल्या पाझर तलावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.हिंगोली शहर व परिसरातही दिवसभर कधी भुरभुर तर कधी पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी दहानंतर दिवसभर पावसाचा हा खेळ सुरू होती. रात्री साडेनऊच्या दरम्यान पाऊस थांबला होता.तब्बल १२ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. त्यानंतर काही शेतकºयांनी कोळपणी,वखरणी, निंदणी शेतातील कामे आटोपून पावसाची वाट शेतकरी अतूरतेने बघत होते. तीन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस चालू होता. या पावसाने शेतकºयामध्येसमाधानाचे वातावरण आहे. ७ जुलै रोजी सकाळी जिल्हाभरात अनेक गावात पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाने पीकांना जीवदान मिळाले असून खरीप पीके वाढीला लागले आहे. यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.केंद्रा बु. परिसरात पाच वर्षांत पहिल्यांदाच पूर४केंद्रा बु.- सेनगाव तालुक्यातील मागील पाच वर्षापासून पावसाचे प्रामण अत्यल्प होत होते. त्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच कोरडे पडत होते. यावर्षी ७ जुलै रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे केंद्रा बु. येथील नदीला मोठा पुर आला. पाच वर्षातील पहिलाच पुर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी नदी काठावर मोठी गर्दी केली होती.खरीपातील पिकांना चांगल्या पावसाची गरज होती. निसर्गाकडून शेतकºयांसाठी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. मागील पाच वर्षात या भागात शापीत पट्टा अशी अवस्था होती. परिसरातील ताकतोडा, कहाकर, वरखेडा, बटवाडी, केंद्रा खु., हिवरा, माहेरखेडा, वलाना, मन्नास पिंपरी, जामठी बु., गोंधनखेडा आदी सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्याची व हिरव्या चाºयाची समस्या मिटली आहे. केंद्रा बु. नदीवरील पुराच्या पाण्याने वृत्त लिहिण्यापर्यंत दोन तासापासून गोरेगाव- रिसोड मार्ग बंद झाला होता. पुलाची उंची वाढविण्यासाठी अनेकवेळा सा.बां. विभागाला सूचना देवूनही उपयोग होत नाही.कळमनुरी तालुक्यातही दमदार पाऊसशहर व परिसरात ७ जुलै रोजी दीड तेदोन तास दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. ६ जुलै पासून रिमझिम पाऊस पडत होता. ७ जुलै रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसाने छोटे नाले तुडूंब भरून वाहिले. तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस पडला. ७ जुलै रोजी दिवसभर पाऊस कमी जास्त सुरूच होता. शेतात पाणीच पाणी साचले होते. शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पिकांची वाढ झपाट्याने होणार आहे. पावसामुळे इसापूर धरणाचे पाणी वाढत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस