शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

१८ गावांची तहान भागतेय टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:18 IST

जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात यंदा ८0 टक्क्यांच्या आसपास पर्जन्यमान झाले. त्यामुळे विविध भागात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वसमत तालुक्यात इसापूर व सिद्धेश्वरचे पाणी सोडल्यामुळे यापूर्वी टंचाई कमी जाणवली. आता पुन्हा एकदा इसापूरची एक पाणीपाळी सोडण्याची तयारी सुरू आहे. ती सोडल्यास २६ गावांतील टंचाईसह गुरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील २४ हजार ६६९ एवढी लोकसंख्या टँकरवर निर्भर आहे. लहान-लहान गावे, वाडी-तांड्यांना टंचाईचा फटका सोसावा लागत आहे. अशा १८ गावांत १३ टँकर सुरू आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यातील कनका, पेडगाव वाडी, जुमडा, अंधारवाडी, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा-खापरखेडा, मसोड, हातमाली, रामवाडी, शिवणी खु., महालिंगी तांडा, सेनगाव तालुक्यातील जयपूर, जवळा बु., कहाकर खु., औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळापाणी तांडा, सेवादास तांडा आदी गावांना टँकर सुरू आहे. काही गावांचे नव्याने प्रस्तावही येत आहेत. मात्र काटेकोरपणे तपासणी करून खरेच टँकरची गरज असल्यासच अशा गावांत टँकर देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.टँकरसहित १२३ गावांत १५९ जलस्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये १६ स्त्रोत टँकरसाठी असून उर्वरित १४३ गावातील टंचाई निवारणार्थ अधिग्रहित केले. यामध्ये हिंगोली-७, कळमनुरी-३८, सेनगाव-५0, वसमत-२८, औंढा नागनाथ २0 अशी तालुकानिहाय संख्या आहे.अधिग्रहणांच्या रक्कमेची दरवर्षीची बोंबशेतकºयांच्या जलस्त्रोताचे प्रशासनाकडून दरवर्षी अधिग्रहण केले जाते. मात्र त्याची देयके वेळेत सादर केली जात नाहीत. तसेच अदाही केली जात नाहीत. गेल्यावर्षीच्या अधिग्रहणाचा मोबदला आता शेतकºयांना मिळाला. यंदाच्या देयकांचा तर अजून पत्ताच नाही. टप्प्या-टप्प्याने देयके अदा केल्यास शेतकºयांना बियाणे व खते खरेदीसाठी फायदा होऊ शकतो. गतवर्षीच्या दायित्वासह आतापर्यंत टंचाईत जवळपास १.२0 कोटींचा खर्च झाला असून त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई