शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
4
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
5
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
6
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
7
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
8
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
9
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
10
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
11
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
12
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
13
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
14
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
15
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
16
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
17
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
18
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
19
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावांची तहान भागतेय टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:18 IST

जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात यंदा ८0 टक्क्यांच्या आसपास पर्जन्यमान झाले. त्यामुळे विविध भागात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वसमत तालुक्यात इसापूर व सिद्धेश्वरचे पाणी सोडल्यामुळे यापूर्वी टंचाई कमी जाणवली. आता पुन्हा एकदा इसापूरची एक पाणीपाळी सोडण्याची तयारी सुरू आहे. ती सोडल्यास २६ गावांतील टंचाईसह गुरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील २४ हजार ६६९ एवढी लोकसंख्या टँकरवर निर्भर आहे. लहान-लहान गावे, वाडी-तांड्यांना टंचाईचा फटका सोसावा लागत आहे. अशा १८ गावांत १३ टँकर सुरू आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यातील कनका, पेडगाव वाडी, जुमडा, अंधारवाडी, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा-खापरखेडा, मसोड, हातमाली, रामवाडी, शिवणी खु., महालिंगी तांडा, सेनगाव तालुक्यातील जयपूर, जवळा बु., कहाकर खु., औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळापाणी तांडा, सेवादास तांडा आदी गावांना टँकर सुरू आहे. काही गावांचे नव्याने प्रस्तावही येत आहेत. मात्र काटेकोरपणे तपासणी करून खरेच टँकरची गरज असल्यासच अशा गावांत टँकर देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.टँकरसहित १२३ गावांत १५९ जलस्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये १६ स्त्रोत टँकरसाठी असून उर्वरित १४३ गावातील टंचाई निवारणार्थ अधिग्रहित केले. यामध्ये हिंगोली-७, कळमनुरी-३८, सेनगाव-५0, वसमत-२८, औंढा नागनाथ २0 अशी तालुकानिहाय संख्या आहे.अधिग्रहणांच्या रक्कमेची दरवर्षीची बोंबशेतकºयांच्या जलस्त्रोताचे प्रशासनाकडून दरवर्षी अधिग्रहण केले जाते. मात्र त्याची देयके वेळेत सादर केली जात नाहीत. तसेच अदाही केली जात नाहीत. गेल्यावर्षीच्या अधिग्रहणाचा मोबदला आता शेतकºयांना मिळाला. यंदाच्या देयकांचा तर अजून पत्ताच नाही. टप्प्या-टप्प्याने देयके अदा केल्यास शेतकºयांना बियाणे व खते खरेदीसाठी फायदा होऊ शकतो. गतवर्षीच्या दायित्वासह आतापर्यंत टंचाईत जवळपास १.२0 कोटींचा खर्च झाला असून त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई