शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

१८ गावांची तहान भागतेय टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:18 IST

जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात यंदा ८0 टक्क्यांच्या आसपास पर्जन्यमान झाले. त्यामुळे विविध भागात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वसमत तालुक्यात इसापूर व सिद्धेश्वरचे पाणी सोडल्यामुळे यापूर्वी टंचाई कमी जाणवली. आता पुन्हा एकदा इसापूरची एक पाणीपाळी सोडण्याची तयारी सुरू आहे. ती सोडल्यास २६ गावांतील टंचाईसह गुरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील २४ हजार ६६९ एवढी लोकसंख्या टँकरवर निर्भर आहे. लहान-लहान गावे, वाडी-तांड्यांना टंचाईचा फटका सोसावा लागत आहे. अशा १८ गावांत १३ टँकर सुरू आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यातील कनका, पेडगाव वाडी, जुमडा, अंधारवाडी, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा-खापरखेडा, मसोड, हातमाली, रामवाडी, शिवणी खु., महालिंगी तांडा, सेनगाव तालुक्यातील जयपूर, जवळा बु., कहाकर खु., औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळापाणी तांडा, सेवादास तांडा आदी गावांना टँकर सुरू आहे. काही गावांचे नव्याने प्रस्तावही येत आहेत. मात्र काटेकोरपणे तपासणी करून खरेच टँकरची गरज असल्यासच अशा गावांत टँकर देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.टँकरसहित १२३ गावांत १५९ जलस्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये १६ स्त्रोत टँकरसाठी असून उर्वरित १४३ गावातील टंचाई निवारणार्थ अधिग्रहित केले. यामध्ये हिंगोली-७, कळमनुरी-३८, सेनगाव-५0, वसमत-२८, औंढा नागनाथ २0 अशी तालुकानिहाय संख्या आहे.अधिग्रहणांच्या रक्कमेची दरवर्षीची बोंबशेतकºयांच्या जलस्त्रोताचे प्रशासनाकडून दरवर्षी अधिग्रहण केले जाते. मात्र त्याची देयके वेळेत सादर केली जात नाहीत. तसेच अदाही केली जात नाहीत. गेल्यावर्षीच्या अधिग्रहणाचा मोबदला आता शेतकºयांना मिळाला. यंदाच्या देयकांचा तर अजून पत्ताच नाही. टप्प्या-टप्प्याने देयके अदा केल्यास शेतकºयांना बियाणे व खते खरेदीसाठी फायदा होऊ शकतो. गतवर्षीच्या दायित्वासह आतापर्यंत टंचाईत जवळपास १.२0 कोटींचा खर्च झाला असून त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई