शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जुन्या निधीचा खर्च नाही अन् नव्याची लागली आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:54 IST

जिल्हा परिषदेत सध्या चालू वर्षातील निधी खर्चाच्या नियोजनासाठी सदस्यांची धावपळ होताना दिसत आहे. काही विभागांनी नियोजन केले. काहींचे सुरू आहे. मात्र या नव्या निधीकडे लक्ष देताना जुन्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जुना ६३ कोटी अखर्चित आहे. तर नव्या ७९ कोटींपैकी ५५ लाखच मिळाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत सध्या चालू वर्षातील निधी खर्चाच्या नियोजनासाठी सदस्यांची धावपळ होताना दिसत आहे. काही विभागांनी नियोजन केले. काहींचे सुरू आहे. मात्र या नव्या निधीकडे लक्ष देताना जुन्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जुना ६३ कोटी अखर्चित आहे. तर नव्या ७९ कोटींपैकी ५५ लाखच मिळाले आहेत.वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेच्या ९ विभागांना विविध योजना, विकास कामांसाठी निधी मिळतो. मात्र गत वर्षभरात सदस्यांतील अंतर्गत वाद व आमदार-खासदारांशी संघर्ष करण्यात निधीच्या खर्चाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. नियोजन करण्याची वेळ येताच अथवा खर्च करताना संक्रांत कोसळणे अनिवार्यच झाले होते. यातून मार्गच न काढल्याने तब्बल ६३ कोटींचा खर्च बाकी राहिला.यामध्ये सर्वाधिक २७.७४ कोटी समाजकल्याणचे असून दलित वस्ती, वसतिगृह अनुदान, विद्यार्थी शुल्क, शिष्यवृत्ती आदींची ही रक्कम आहे. त्यानंतर पंचायत विभागाचे ६.७७ कोटी शिल्लक असून जनसुविधा, ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम आदीचा हा निधी आहे. शिक्षण विभागाचे २.४0 कोटी शिल्लक आहेत. यात मुलींचा उपस्थिती भत्ता, शाळा इमारत, दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. आरोग्य विभागाचाही १.६४ कोटींचा निधी शिल्लक असून आरोग्य केंद्रांमध्ये औषधी, साधनसामुग्री खरेदी, देखभाल दुरुस्ती आदीचा हा निधी आहे. पाणीपुरवठा विभागाचा १.१५ कोटींचा निधी शिल्लक असून यात नळयोजनांसह जलयुक्तमधील कामांचा समावेश आहे. कृषी विभागाचा ७.0२ कोटींचा निधी शिल्लक असून यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व इतर बाबींचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाचा दवाखान्यांचे बळकटीकरण, औषधी पुरवठा, खाद्यपुरवठा, प्रचार व प्रदर्शनी, कामधेनु दत्तक योजना आदींचा २.१२ कोटींचा निधी शिल्लक आहे. लघुसिंचन विभागाचाही पाटबंधारेच्या तलावाच्या साईट नसल्याने ५.५४ कोटींचा निधी शिल्लक असून तो परत जाण्याचीच शक्यता जास्त आहे. बांधकाम विभागाचा यात्रास्थळ विकास, पर्यटन, ग्रामीण रस्ते, जिल्हा रस्ते विकास आदींचा ६.२६ कोटींचा निधी शिल्लक आहे.यातील काही विभागांची कामे सुरू असली तरीही निधी खर्च करण्यास मोठा विलंब होत असल्याचे दिसते. मार्च एण्डपर्यंत हा निधी खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर मात्र शासनखाती जमा करण्याशिवाय तरणोपाय नाही. तर दुसरीकडे चालू आर्थिक वर्षात ७९ कोटी रुपये मंजूर आहेत. यात सर्वसाधारणमध्ये ४१.८0 कोटी, विशष घटकमध्ये ३७.२५ कोटी रुपयांचा निधी आहे. मात्र यापैकी अवघे ५५ लाख रुपये बीडीएसवर मिळाले आहेत. यातील काही निधीचेच नियोजन समित्यांनी केले. बहुतांश निधीचे नियोजनच बाकी आहे. त्या निधीची प्रतीक्षा लागली आहे. मात्र जुना निधी खर्च झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय नव्याची मागणी करण्यास अडचण येत आहे. जिल्हा नियोजन विभागही याचा गैरफायदा घेऊन निधी देण्यास विरोध करताना दिसत आहे.जिल्हा परिषदेच्या निधीमध्ये असणारी वरिष्ठ लोकप्रतिनिधींची अडचण आता निवडणुकीच्या तोंडावर दूर होणार आहे. मात्र जि.प.तील सदस्यांनाच आता एकमताने नियोजन करण्यास गतिमानता दाखवावी लागणार आहे. त्याशिवाय ही कामे वेळेत सुरू होतील, असे दिसत नाही. २0१९ मध्ये लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकाही असल्याने ही काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी