शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी ...

हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी आजपर्यंत मृत पावलेला नाही. यामुळे सध्यातरी ‘बर्ड फ्लू’चा धाेका नसल्याचे पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बासंबा येथे सुभाष निरगुडे यांच्याकडेच एक पोल्ट्री फार्म आहे. तेथील कोंबड्याही सुरक्षित आहेत. हिंगोली जिल्हा हा छोटा असून जिल्ह्यात कुठेही मोठे धरण नाही. त्यामुळे विदेशी पक्षी येण्याचा प्रश्नच नाही. विदेशी पक्षी ज्या ठिकाणी येतात. तेथे ‘बर्ड फ्लू’सारखे आजार उद्‌भवण्याचे मोठे कारण असते.

कोरोना आजारानंतर ‘बर्ड फ्लू’सारख्या आजाराने राज्यात डोके वर काढले आहे.

जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. त्यातच आता ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली होती. परंतु, ‘बर्ड फ्लू’चा हिंगोली जिल्ह्यात काही परिणाम झालेला दिसून येत नाही. शहरात जवळपास पन्नास ते साठ चिकन सेंटर सद्य:स्थितीत अस्तित्वात आहेत. कोंबडीची अंडी पूर्वी ७ रुपयाला एक याप्रमाणे विकली जात होती. आता ६ रुपयाला एक याप्रमाणे विक्री करीत असल्याचे शेख अल्ताफ यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी

n हिंगोली जिल्ह्यात आजमितीस तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. ज्या शेतकऱ्यांची किंवा पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्यांच्या कोंबड्या मृत पावत असतील तर त्यांनी उशीर न लावता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. अर्ज आल्यास वेळीच त्यांच्यापर्यंत पथक पाठवून औषधोपचार केला जातो.

आजमितीस तरी हिंगोली जिल्ह्यात बर्ड फ्लू हा आजार नाही. त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. पक्ष्यांची योग्यरितीने काळजी घेतली जात आहे.

- डाॅ. लक्ष्मण पवार, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, हिंगोली

मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा

जिल्ह्यातील बासंबा येथे एकाच ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे. दुसरीकडे कोठेही पोल्ट्री फार्म नाही. पोल्ट्री चालक किंवा शेतकऱ्यांच्या पशु, पक्ष्यांना काही आजार असेल तर त्यांनी लगेच जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.