शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी ...

हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी आजपर्यंत मृत पावलेला नाही. यामुळे सध्यातरी ‘बर्ड फ्लू’चा धाेका नसल्याचे पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बासंबा येथे सुभाष निरगुडे यांच्याकडेच एक पोल्ट्री फार्म आहे. तेथील कोंबड्याही सुरक्षित आहेत. हिंगोली जिल्हा हा छोटा असून जिल्ह्यात कुठेही मोठे धरण नाही. त्यामुळे विदेशी पक्षी येण्याचा प्रश्नच नाही. विदेशी पक्षी ज्या ठिकाणी येतात. तेथे ‘बर्ड फ्लू’सारखे आजार उद्‌भवण्याचे मोठे कारण असते.

कोरोना आजारानंतर ‘बर्ड फ्लू’सारख्या आजाराने राज्यात डोके वर काढले आहे.

जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. त्यातच आता ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली होती. परंतु, ‘बर्ड फ्लू’चा हिंगोली जिल्ह्यात काही परिणाम झालेला दिसून येत नाही. शहरात जवळपास पन्नास ते साठ चिकन सेंटर सद्य:स्थितीत अस्तित्वात आहेत. कोंबडीची अंडी पूर्वी ७ रुपयाला एक याप्रमाणे विकली जात होती. आता ६ रुपयाला एक याप्रमाणे विक्री करीत असल्याचे शेख अल्ताफ यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी

n हिंगोली जिल्ह्यात आजमितीस तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. ज्या शेतकऱ्यांची किंवा पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्यांच्या कोंबड्या मृत पावत असतील तर त्यांनी उशीर न लावता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. अर्ज आल्यास वेळीच त्यांच्यापर्यंत पथक पाठवून औषधोपचार केला जातो.

आजमितीस तरी हिंगोली जिल्ह्यात बर्ड फ्लू हा आजार नाही. त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. पक्ष्यांची योग्यरितीने काळजी घेतली जात आहे.

- डाॅ. लक्ष्मण पवार, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, हिंगोली

मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा

जिल्ह्यातील बासंबा येथे एकाच ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे. दुसरीकडे कोठेही पोल्ट्री फार्म नाही. पोल्ट्री चालक किंवा शेतकऱ्यांच्या पशु, पक्ष्यांना काही आजार असेल तर त्यांनी लगेच जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.