शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST

हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी ...

हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी आजपर्यंत मृत पावलेला नाही. यामुळे सध्यातरी ‘बर्ड फ्लू’चा धाेका नसल्याचे पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बासंबा येथे सुभाष निरगुडे यांच्याकडेच एक पोल्ट्री फार्म आहे. तेथील कोंबड्याही सुरक्षित आहेत. हिंगोली जिल्हा हा छोटा असून जिल्ह्यात कुठेही मोठे धरण नाही. त्यामुळे विदेशी पक्षी येण्याचा प्रश्नच नाही. विदेशी पक्षी ज्या ठिकाणी येतात. तेथे ‘बर्ड फ्लू’सारखे आजार उद्‌भवण्याचे मोठे कारण असते.

कोरोना आजारानंतर ‘बर्ड फ्लू’सारख्या आजाराने राज्यात डोके वर काढले आहे.

जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. त्यातच आता ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली होती. परंतु, ‘बर्ड फ्लू’चा हिंगोली जिल्ह्यात काही परिणाम झालेला दिसून येत नाही. शहरात जवळपास पन्नास ते साठ चिकन सेंटर सद्य:स्थितीत अस्तित्वात आहेत. कोंबडीची अंडी पूर्वी ७ रुपयाला एक याप्रमाणे विकली जात होती. आता ६ रुपयाला एक याप्रमाणे विक्री करीत असल्याचे शेख अल्ताफ यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी

n हिंगोली जिल्ह्यात आजमितीस तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. ज्या शेतकऱ्यांची किंवा पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्यांच्या कोंबड्या मृत पावत असतील तर त्यांनी उशीर न लावता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. अर्ज आल्यास वेळीच त्यांच्यापर्यंत पथक पाठवून औषधोपचार केला जातो.

आजमितीस तरी हिंगोली जिल्ह्यात बर्ड फ्लू हा आजार नाही. त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. पक्ष्यांची योग्यरितीने काळजी घेतली जात आहे.

- डाॅ. लक्ष्मण पवार, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, हिंगोली

मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा

जिल्ह्यातील बासंबा येथे एकाच ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे. दुसरीकडे कोठेही पोल्ट्री फार्म नाही. पोल्ट्री चालक किंवा शेतकऱ्यांच्या पशु, पक्ष्यांना काही आजार असेल तर त्यांनी लगेच जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.