शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
4
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
5
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
6
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
7
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
8
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
9
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
10
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
11
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
12
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
13
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
14
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
15
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
16
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
17
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
18
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
19
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
20
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

रात्रीही नसते वीज; महावितरणचा तांत्रिक बिघाड उठला शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:37 IST

हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली.

ठळक मुद्देपिकांना पाणी देण्यासाठी करावी लागते कसरत

हिंगोली : महावितरणकडून तांत्रिक समस्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना रात्रंदिवस वीज दिली जात नसल्याचा प्रकार घडत आहे. दिवसा आठ तास आणि रात्री दहा तासांची वीज तर कागदावरच असून कारण विचारले तर तांत्रिक बिघाड पुढे करून शेतकऱ्यांची बोळवण केली जाते.

हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांना रबीच्या हंगामाची आस  आहे. मात्र वीजच राहात नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली. तरीही ग्रामीण भागात वीज सुरळीत राहात नाही. अनेक कंत्राटदारांवर आरोप झाले. तपासणी झाली. मात्र कारवाई शून्य असल्याने त्याचा फटका आता शेतकरी भोगत आहेत. केवळ भार वाढल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे.

रात्रीचा वीजपुरवठा धोकादायकशेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वेळेनुसार शेतात जावे लागते. रात्री-अपरात्री वीज येत असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी स्टार्टरमध्ये बिघाड झाल्यास शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी जावे लागते. यामध्ये साप, विंचू  व  वन्य प्राण्यांचा सर्वाधिक धोका शेतकऱ्यांना असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा करण्याऐवजी सकाळी वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणीयावर्षी जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांकडील असलेल्या विहीर, बोअर आदी जलस्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर सध्या शेतकरी रबी हंगामातील ज्वारी, हरभरा व गव्हासाठी करीत आहेत. एकीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या उदासीनतेने शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ  मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू करण्याची गरज आहे.

सध्या गव्हू, हरभरा पिकांना विहिर, बोअरद्वारे पाणी देण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे विहिर, बोअरला पुरसेशे पाणी उपलब्ध असूनही पिकांना पाणी मिळत नसल्याचे चित्र सध्या हिंगोली तालुक्यातील सवड परिसरात आहे.   - सदाशिव थोरात, शेतकरी

दिवसा आठ तर रात्री दहा तास वीजपुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. मात्र तरीही तांत्रिक अडचण आल्यास तेवढ्या भागापुरताच वीजपुरवठा काही काळ खंडित असतो. त्याशिवाय भारनियमन केले जात नाही - नरदेव, महावितरण अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीelectricityवीज