शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

रात्रीही नसते वीज; महावितरणचा तांत्रिक बिघाड उठला शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:37 IST

हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली.

ठळक मुद्देपिकांना पाणी देण्यासाठी करावी लागते कसरत

हिंगोली : महावितरणकडून तांत्रिक समस्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना रात्रंदिवस वीज दिली जात नसल्याचा प्रकार घडत आहे. दिवसा आठ तास आणि रात्री दहा तासांची वीज तर कागदावरच असून कारण विचारले तर तांत्रिक बिघाड पुढे करून शेतकऱ्यांची बोळवण केली जाते.

हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांना रबीच्या हंगामाची आस  आहे. मात्र वीजच राहात नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली. तरीही ग्रामीण भागात वीज सुरळीत राहात नाही. अनेक कंत्राटदारांवर आरोप झाले. तपासणी झाली. मात्र कारवाई शून्य असल्याने त्याचा फटका आता शेतकरी भोगत आहेत. केवळ भार वाढल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे.

रात्रीचा वीजपुरवठा धोकादायकशेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वेळेनुसार शेतात जावे लागते. रात्री-अपरात्री वीज येत असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी स्टार्टरमध्ये बिघाड झाल्यास शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी जावे लागते. यामध्ये साप, विंचू  व  वन्य प्राण्यांचा सर्वाधिक धोका शेतकऱ्यांना असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा करण्याऐवजी सकाळी वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणीयावर्षी जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांकडील असलेल्या विहीर, बोअर आदी जलस्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर सध्या शेतकरी रबी हंगामातील ज्वारी, हरभरा व गव्हासाठी करीत आहेत. एकीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या उदासीनतेने शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ  मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू करण्याची गरज आहे.

सध्या गव्हू, हरभरा पिकांना विहिर, बोअरद्वारे पाणी देण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे विहिर, बोअरला पुरसेशे पाणी उपलब्ध असूनही पिकांना पाणी मिळत नसल्याचे चित्र सध्या हिंगोली तालुक्यातील सवड परिसरात आहे.   - सदाशिव थोरात, शेतकरी

दिवसा आठ तर रात्री दहा तास वीजपुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. मात्र तरीही तांत्रिक अडचण आल्यास तेवढ्या भागापुरताच वीजपुरवठा काही काळ खंडित असतो. त्याशिवाय भारनियमन केले जात नाही - नरदेव, महावितरण अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीelectricityवीज