शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यातील ३२६ शाळा सुरू होतील सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

राज्यात गतवर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. काही काळ आधी नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू ...

राज्यात गतवर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. काही काळ आधी नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने शासनाने हा निर्णय घेतला होता. पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आणि शाळा बंद पडल्या. सतत शाळा बंद राहात असल्याने मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत तर तिसऱ्या लाटेचा धोका दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना जास्त असल्याचे तज्ज्ञांचे अनुदान आहे. त्यामुळे सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

हे वर्ग सुरू करताना गाव कोरोनामुक्त आवश्यक असून पालकांशी चर्चा करून ठराव घ्यायचा आहे. तर शाळेत टप्प्याटप्प्यात मुलांना बोलावयाचे आहे. जसे की वर्गांना बदलीच्या दिवशी अथवा सकाळ व दुपार सत्रात बोलवावे. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शाळेत हात धुण्याची व्यवस्था, निर्जंतुकीकरण, क्वारंटाईन सेंटर असल्यास ते इतरत्र हलविणे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, मास्कच्या वापराची सूचना दर्शनीभागात लावणे, थुंकण्यावरील बंदीचे काटेकोर पालन करणे, रांगेत उभे राहण्यासाठी सहा फुटांच्या अंतराची आखणी करणे, गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध, आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, कुटुंबातील व्यक्तींनी नियमित वाफ घ्यावी. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. शाळेत शक्यतो वैयक्तिक वाहनाने विद्यार्थ्यांना आणून सोडावे, चालक, वाहक व विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतराची दक्षता घ्यावी, वाहनाच्या खिडक्या उघड्या असाव्यात, मुलांच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या काळात अंतर राखले जावे, प्रात्यक्षिक व इतर कार्य लहान गट करून घ्यावे, मुलांनी साहित्याची अदलाबदल करू नये, अशा सक्त सूचना द्याव्यात, वर्ग खुल्या परिसरात घेतल्यास अधिक उत्तम असेही सांगण्यात आले तरीही कोणी संशयित आढळल्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे, मुख्याध्यापकांनी कोविड सेंटरची माहिती व क्रमांक मोबाईलमध्ये ठेवावी, असेही सूचित केले.

शिक्षकांनी त्याच गावात राहावे

ठराविक विषयांसाठी प्राधान्य देण्यास सांगितले आहे तसेच संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याची दक्षता घ्यावी, असे विशेषत्वाने नमूद केले. तर शाळेत आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाळायच्या आहेत.

९ वी ते १२ वीच्या एकूण शाळा ३२६

अंदाजित शिक्षक व कर्मचारी ३५००

वर्गनिहाय विद्यार्थी

आठवी २०७४०

नववी २०५३५

दहावी १९५१९

अकरावी१२६५७

बारावी १३३८७

शासनाने आज शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांसह निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी