शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

...तर जिल्ह्यातील ३२६ शाळा सुरू होतील सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

राज्यात गतवर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. काही काळ आधी नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू ...

राज्यात गतवर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. काही काळ आधी नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने शासनाने हा निर्णय घेतला होता. पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आणि शाळा बंद पडल्या. सतत शाळा बंद राहात असल्याने मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत तर तिसऱ्या लाटेचा धोका दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना जास्त असल्याचे तज्ज्ञांचे अनुदान आहे. त्यामुळे सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

हे वर्ग सुरू करताना गाव कोरोनामुक्त आवश्यक असून पालकांशी चर्चा करून ठराव घ्यायचा आहे. तर शाळेत टप्प्याटप्प्यात मुलांना बोलावयाचे आहे. जसे की वर्गांना बदलीच्या दिवशी अथवा सकाळ व दुपार सत्रात बोलवावे. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शाळेत हात धुण्याची व्यवस्था, निर्जंतुकीकरण, क्वारंटाईन सेंटर असल्यास ते इतरत्र हलविणे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, मास्कच्या वापराची सूचना दर्शनीभागात लावणे, थुंकण्यावरील बंदीचे काटेकोर पालन करणे, रांगेत उभे राहण्यासाठी सहा फुटांच्या अंतराची आखणी करणे, गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध, आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, कुटुंबातील व्यक्तींनी नियमित वाफ घ्यावी. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. शाळेत शक्यतो वैयक्तिक वाहनाने विद्यार्थ्यांना आणून सोडावे, चालक, वाहक व विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतराची दक्षता घ्यावी, वाहनाच्या खिडक्या उघड्या असाव्यात, मुलांच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या काळात अंतर राखले जावे, प्रात्यक्षिक व इतर कार्य लहान गट करून घ्यावे, मुलांनी साहित्याची अदलाबदल करू नये, अशा सक्त सूचना द्याव्यात, वर्ग खुल्या परिसरात घेतल्यास अधिक उत्तम असेही सांगण्यात आले तरीही कोणी संशयित आढळल्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे, मुख्याध्यापकांनी कोविड सेंटरची माहिती व क्रमांक मोबाईलमध्ये ठेवावी, असेही सूचित केले.

शिक्षकांनी त्याच गावात राहावे

ठराविक विषयांसाठी प्राधान्य देण्यास सांगितले आहे तसेच संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याची दक्षता घ्यावी, असे विशेषत्वाने नमूद केले. तर शाळेत आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाळायच्या आहेत.

९ वी ते १२ वीच्या एकूण शाळा ३२६

अंदाजित शिक्षक व कर्मचारी ३५००

वर्गनिहाय विद्यार्थी

आठवी २०७४०

नववी २०५३५

दहावी १९५१९

अकरावी१२६५७

बारावी १३३८७

शासनाने आज शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांसह निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी