शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दहावीची परीक्षा सुरू, कॉपीबहाद्दर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:35 IST

औरंगाबाद बोर्डाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५३ परीक्षा केंद्रावरून केंद्रावरून इयत्ता दहावीची १६ हजार ५६६ पैकी १६ हजार २५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला ३१२ विद्यार्थी गैरहजर राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औरंगाबाद बोर्डाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५३ परीक्षा केंद्रावरून केंद्रावरून इयत्ता दहावीची १६ हजार ५६६ पैकी १६ हजार २५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला ३१२ विद्यार्थी गैरहजर राहिले.दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. डायटचे प्राचार्य गणेश गणेश शिंदे यांनी हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील चंदूलाल मुंदडा हायस्कूल परीक्षा केंद्राला भेट दिली असता एक विद्यार्थी परीक्षेत नक्कल करताना त्यांना आढळून आला.कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती परीक्षा विभााातर्फे देण्यात आली. तसेच शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी कळमनुरी तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तर उपशिक्षणाधिकारी डी.के.इंगोले, उप शिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनीही विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. परीक्षेसाठी ९१६ पर्यवेक्षकांची तालुका अंतर्गत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची अदलाबदल करून नियुक्ती करण्यात आली.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आदेशीत केले असून फिरत्या पथकाद्वारे केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. शांततामय व कॉपिमुक्त वातारणात विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावा. परीक्षेत नक्कल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी