शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्कार गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:40 IST

आदर्श पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना जवळ आला तरी, अद्याप पात्र शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस्त्यात आहे. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदर्श पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना जवळ आला तरी, अद्याप पात्र शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस्त्यात आहे. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने यापूर्वी दिली. त्यातही बदल करण्यात आला. परंतु पुढची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे आदर्श शिक्षक पुस्कार सोहळा कधी पार पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवड समितीची बैठक झाली असली तरी विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे आता कोणत्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल, याचा मेळ नाही. शिवाय याबाबत शिक्षण विभागाकडे माहितीही उपलब्ध नाही. संबधित तालुक्याच्या गट-शिक्षणाधिकाºयांनी जिल्हा शिक्षण कार्यालयात १६ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले होते. प्रस्ताव मंजूरीनंतर कार्यक्रमाची तारीख ठरणार असल्याचे शिक्षकांतून सांगण्यात आले. परंतु दरवर्षीच पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. याला संबधित शिक्षण यंत्रणा व जि. प. प्रशासन कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. वेळोवेळी कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याने हा सोहळा कधी पार पडणार? याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी दरवर्षीच या सोहळ्याचे नियोजन बारगळते. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.पुरस्कार वितरणाबाबत दरवर्षी नियोजन केले जात नाही. त्यात बैठकही लवकर होत नाही. परिणामी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडतो, यावर्षीही गतवर्षीचे चित्र आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक