शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे ठरतेय जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यातील खराब रस्ते व समोरील वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसे मोबाइलवर बोलत वाहन चालविल्यानेही ...

हिंगोली : जिल्ह्यातील खराब रस्ते व समोरील वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसे मोबाइलवर बोलत वाहन चालविल्यानेही अपघातात भर पडत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. मात्र, अनेक वाहनचालक मोबाइलवर बोलत वाहने चालवीत असल्याचे सर्रास दिसून येत आहे. खराब रस्ते जसे अपघाताला कारणीभूत ठरताहेत, तसेच मोबाइलवर बोलण्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांमुळे समोरील व्यक्तीलाही जखमी व्हावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ हटेना

मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेला ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे गत दीड वर्षापासून ब्रेथ ॲनालायझरचा वापर करणे बंद झाले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांना रान माेकळे झाले आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांमध्ये मद्यपी वाहनचालकांचाही समावेश आहे. यातून अपघात होत आहेत.

हिंगोली शहरात २० अपघात

हिंगोली शहरात जिल्हाभरातून नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनाने येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते. मागील दीड वर्षात हिंगोली शहरात अपघातांच्या २० घटना घडल्या. यात अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांश जखमी झालेल्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. दरम्यान, हेल्मेट न घालता व मोबाइलवर बोलताना अपघात झाला असा अनेक वेळा नोंद घेतली जात नाही.

२०२० मध्ये जिल्ह्यात झालेले अपघात

अपघात - २३३

जखमी -२२५

मृत्यू - १२५

या वर्षात केलेला दंड प्रकरणे दंड

वाहन चालविताना मोबाइल वापर- ६२३ १२४६००

नो पार्किंग- ६३९९ १२७९८००

अधिक वेग ३९६८ ३९६८०००

ट्रिपल सीट २५२७ ३०५४००

धोकादायक वाहन चालविणे- ७३९ ७३९०००

वायुप्रदूषण-