शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

‘न.प.च्या घोटाळ्यांतील दोषींवर कारवाई करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:17 IST

नगर पालिकेत झालेल्या साडेअकरा कोटीच्या घोटाळा दडपण्याचे प्रयत्न होत असल्याने न.प.चे कर्मचारी पुन्हा धरणे आंदोलनासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : नगर पालिकेत झालेल्या साडेअकरा कोटीच्या घोटाळा दडपण्याचे प्रयत्न होत असल्याने न.प.चे कर्मचारी पुन्हा धरणे आंदोलनासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. सोमवारपासून आझाद मैदानावर आंदोलनास प्रारंभ होणार आहे. घोटाळ्यातील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कर्मचाºयांची मागणी आहे. शासनाच्या निधी गैरमार्गाने खर्च झाल्याच्या प्रकरणास नगरविकास मंत्रालयही गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.वसमत नगर पालिके शासनास खोटी माहिती पुरवून सहाय्यक अनुदानाचे साडेअकरा कोटी रुपये जास्त अनुदान प्राप्त करून घेतले. ज्यादा आलेले अनुदान शासनाला परत न करता गैरपद्धतीने खर्च करून रक्कम संपवली. कर्मचाºयांच्या वेतनासाठीच अनुदान गुत्तेदारांची बिले, झेरॉक्सची लाखो रुपयाची बोगस बिले. शासनाकडून दुसरा निधी मिळवण्यासाठी लोकवर्गणी भरण्यासाठी हा निधी वापरण्यात आला. गुत्तेदाराची बिले काढण्यावर शासनाचा निधी वापरून अनेकांची घरे भरण्यात आली. या गंभीर प्रकरणाची शासनाकडून चौकशी झाली. दोषी कोण हे स्पष्ट झाले मात्र आजवर या घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई काही झाली नाही. शासनाच्या निधीचा गैरवापर करणाºया विरोधात कारवाई व्हावी, यासाठी न.प. कर्मचारी संघटनेने वेळोवेळी आंदोलनही केले. मंत्रालयासमोर उपोषणे झाली. वेळोवेळी आश्वासनाशिवाय पुढे काही झाले नाही. सहाय्यक अनुदानाच्या गैरमार्गाने खर्च झाल्याचा प्रकाराने न.प. कर्मचाºयांना वेतन मिळणे कठीण झाले. अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले असून कर्ज, विम्याचे हप्ते असा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कर्मचाºयांचा पाठपुरावा संपवण्यासाठी कर्मचाºयांचे वेतन नियमीतचा प्रयत्न झाला. मात्र अद्याप सहाय्यक अनुदानातून कपात सुरूच आहे. या प्रकरणाने कर्मचारी त्रस्त आहेत.लाखो रुपये झेरॉक्सवर खर्च झाले एवढ्या झेरॉक्स कशाच्या काढल्या याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या काळात बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्धार कर्मचारी संघटनेने केला आहे. वसमत येथील न.प.ने कर्मचारी युनीयन (लालबावटा) पदाधिकारी व कर्मचारी रविवारी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सोमवारपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे. आता या अधिवेशनात तरी सहाय्यक अनुदानाच्या घोटाळ्यावर व घोटाळा करणाºयांवर कारवाई होईल, अशी आशा आहे.कोट्यांवधीचा घोटाळा करून स्वत:ची घरे भरणाºयांवर गुन्हे दाखल होईपर्यंत व कर्मचाºयांना वेठीस धरणाºयांवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहिल. असे संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, बी.एम. वाघमारे, गायकवाड आदींनी सांगितले. शासनाच्या चौकशी अहवालात दोषी अधिकारी, कर्मचारी निष्पन्न झाल्यानंतरही कागदी घोडे नाचवल्याशिवाय कोणतीच कारवाई होत नसल्याने या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचे प्रकार मुंबई स्तरावरूनही सुरू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMONEYपैसा