शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली कृषी कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणे न उगवल्याने निवेदने देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती.

हिंगोली: जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन तोडफोड करून शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणे न उगवल्याने निवेदने देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करून आज स्वाभिमानीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयातील साहित्याची आदळआपट करुन नासधूस केली. त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही? याबाबतही जाब विचारला. तर लोखंडे यांच्यासमोरच  खुर्च्यांची तोडफोड केली.

यावेळी अधीक्षक विजय लोखंडे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. लोखंडे यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्याचा आदेश काढला आहे. जिल्हास्तरीय समितीला एवढ्या सगळ्या तक्रारींवर पाहणी करून निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळे मंडळ अधिकारी आता पाहणी करून अहवाल सादर करतील, असेही लोखंडे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली