शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

संदिग्ध प्रमाणपत्रांची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:05 IST

शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमध्ये आधी शिक्षण विभागाकडून योग्य छाननी झाली नसल्याचा परिणाम म्हणून की काय, नंतर विविध प्रमाणपत्रांवरून तक्रारी झाल्या. आता १0 जुलैला यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमध्ये आधी शिक्षण विभागाकडून योग्य छाननी झाली नसल्याचा परिणाम म्हणून की काय, नंतर विविध प्रमाणपत्रांवरून तक्रारी झाल्या. आता १0 जुलैला यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ टप्प्यांमध्ये शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. जवळपास अडीच हजार बदलीपात्र शिक्षक होते. त्यापैकी १४00 ते १५00 शिक्षकांच्या बदल्या झाल्याचा अंदाज आहे. यातील संवर्ग १ व २ मध्ये विविध प्रमाणपत्रांचा आधार घेवून शिरकाव केल्याच्या अनेक तक्रारी शिक्षकांतूनच होत्या. त्याची तपासणी शिक्षण विभागाकडून होत आहे. संवर्ग १ मध्ये विधवा, परित्यक्ता, कुमारिका, दिव्यांग व ५३ वर्षांवरील शिक्षकांचा समावेश आहे. तर संवर्ग २ मध्ये गंभीर आजारी, दुर्धर आजार आदींचा समावेश आहे. संवर्ग-३, ४ पर्यंत ही साखळी चालत आली होती. याशिवाय काहींनी तर पती खाजगी सेवेत असतानाही त्याची माहिती जोडून पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ घेतल्याचीही बोंब होती. एकूण ४00 च्या आसपास शिक्षकांनी अशी प्रमाणपत्रे जोडली होती. यात काही बाबतीत संदिग्धता वाटत असल्याने अशा २00 ते २५0 शिक्षकांना १0 जुलै रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सुनावणीस पाचारण केले आहे. ते या समितीचे अध्यक्ष असून यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, परिवहन महामंडळाचा अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता, शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती सर्व कागदपत्रांची छाननी करणार आहे. यात बोगस प्रमाणपत्र सादर करणाºयांची प्रकरणे वेगळी काढण्यात येणार आहेत. त्यावर पुन्हा अपात्रतेचा निर्णय घेतला जाण्याची भीती आहे. ज्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रांचा लाभ घेतला, अशांवर आता नेमकी काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे. तूर्त तरी या प्रकाराची एकच चर्चा होत आहे. पडताळणीत अडकणार नाही, यासाठीही काहीजण प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रशासन थारा लागू देत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये थेट जि.प.त तक्रारीच झालेल्या आहेत. त्यामुळे अशांना तर कोणत्याही परिस्थितीत वाचविणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.बदलीची प्रक्रिया आॅनलाईन असल्याने प्रमाणपत्रांची पडताळणी होणारच नाही, असा समज करून घेतलेल्या काहींनी असे धाडस केल्याची चर्चा रंगत आहे. तर यापूर्वी केलेली पडताळणी जुजबी असल्याने त्याचा फायदा लाटला गेल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक