शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अचानक संपामुळे प्रवाशांचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:53 IST

शासनाने अपेक्षित पगारवाढ दिली नसल्याच्या कारणावरून परिवहन महामंडळाचे कर्मचारी अचानक संपावर गेल्याने गुरुवारी सकाळच्या ८ ते १0 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आगार नियंत्रकांनी फेºया सुरळीत केल्याचे पहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने अपेक्षित पगारवाढ दिली नसल्याच्या कारणावरून परिवहन महामंडळाचे कर्मचारी अचानक संपावर गेल्याने गुरुवारी सकाळच्या ८ ते १0 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आगार नियंत्रकांनी फेºया सुरळीत केल्याचे पहायला मिळाले.राज्यात कर्मचाºयांनी अचानकच हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला. हिंगोलीतही त्याचे लोण पसरले होते. मात्र यामुळे सकाळच्या वेळच्या ८ ते १0 बसफेºया न झाल्याने प्रवाशांची बोंब वाढू लागली होती. त्यानंतर ९ च्या सुमारास हिंगोली बसस्थानकात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्याचबरोबर या अघोषित व अनधिकृत संपाबाबत प्रशासनानेही चालक-वाहकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी पुन्हा कामावर येण्याची तयारी दर्शविली. तर जे कर्मचारी फेºया नेण्यास इच्छुक नाहीत, आज काम करण्यास इच्छुक नाहीत, अशांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे एकेक जण संपातून माघार घेताना दिसत होता. शिवाय कोणत्याही संघटनेने यासाठी पुढाकार घेतलेला नसल्याने पदाधिकारीही पुढे येत नव्हते. त्यामुळे कर्मचाºयांचे बळ अपुरे पडले.याबाबत आगारप्रमुख झरीकर यांना विचारले असता ते म्हणाले, सकाळच्या वेळी काही फेºया रद्द कराव्या लागल्या. मात्र दहा वाजेनंतर सर्व काही सुरळीत सुरू आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही मागविला आहे. सेनगाव व औंढा नागनाथ येथे स्वतंत्र आगार नसल्याने इतर ठिकाणाहून येणाºया बसफेºयांवरच पूर्ण भिस्त आहे. इतरांच्या रद्द झालेल्या तेवढ्या फेºया रद्द झाल्याचे चित्र होते.वसमतला सहभाग नाहीपरिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी पुकारलेला संप वसमतमध्ये पहायला मिळाला नाही. त्यामुळे या आगारातून सर्व बसफेºया सुरळीत सुरू असल्याचे चित्र होते.कळमनुरी आगारातील कर्मचारी, चालक, वाहकांनी मात्र संपात पूर्णपणे सहभाग नोंदविल्याने दुपारपर्यंत केवळ पाचच बस आगाराबाहेर पडल्या. दिवसभरात येथून १८८ बसफेºया होतात. दुपारनंतर चित्र बदलेल. कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर येतील, अशी माहिती आगारातून देण्यात आली. येथे चालक ७१ व वाहक ७४कार्यरत असून यांचाच संपात सहभाग आहे. प्रशासकीय व यांत्रिकी कर्मचारी मात्र कर्तव्यावर आहेत. येथून बसफेºया जात नसल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. याचा फायदा मात्र खाजगी वाहनांना मोठ्या प्रमाणात झाला.बस कर्मचाºयांच्या संपामुळे रस्त्यावर बस धावल्याच नसल्याने मात्र तालुक्यातील अनेक खेड्या-पाड्यांतील लोकांना खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला. यातही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीST Strikeएसटी संप