शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

हिंगोलीत जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक व खादयान्न वस्तूवर जीएसटी नसावा, रिटर्न ...

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक व खादयान्न वस्तूवर जीएसटी नसावा, रिटर्न चुकीचे असेल तर ते दुरुस्त करण्याची तरतूद असावी, IGST ऐवजी CGST आणि SGST किंवा CGST आणि SGST ऐवजी IGST भरला गेला असेल तर करदात्याला तो समायोजित करण्याची तरतूद असावी, विविध प्रकारचे लेजर (CGST, IGST, SGST व्याज दंड) ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे, दोन महिने रिटर्न भरले नसले तर व्यावसायिकांचे ई- वे बिल करता येत नाही. त्यामुळे पुरवठादारास विनाकारण त्रास होतो. वसुली आणि पुरवठा संबंधिताच्या अडचणी निर्माण होतात. नवीनच आलेल्या ई - वे बिलाची वैधता २४ तासात १०० किलोमीटर ऐवजी २०० किलोमीटर करण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक अडचणी निर्माण होणार आहेत. सदर बाबतीत सुट्या, बंद, एकाच वाहनातून अनेक जागी खाली होणारा माल या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. जीएसटीचे अधिकाऱ्यांमार्फत कोणतीही पूर्व सूचना अथवा खुलासा करण्याची संधी न देता जीएसटी नोंदणी रद्द करण्याची तरतूद अन्यायकारक आहे. आधार कार्डवर आधारित नवीन नोंदणीसाठी तीन दिवस तर इतरांसाठी सात दिवस अशी कालमर्यादा बदलून ती सात दिवस आणि तीस दिवस करण्यात आलेली आहे. सदरचा बदल अनावश्यक आहे. पुरवठादाराने जीएसटी भरला नाही तर त्याची जबाबदारी खरेदी दारावर येत आहे. ती तरतूद बदलावी, जीएसटी सोबत फूड सेफ्टी कायदा तसेच आयकर कायद्यातील काही तरतुदी प्रामाणिक व्यावसायिकांना अन्यायकारक असून त्यात बदल होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जीएसटीतील अन्यायकारक व किचकट तरतूदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ सहभागी, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांच्या इतर संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनावर माजी आ. गजाननराव घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल, मयूर कयाल, अनिल नैनवाणी, कैलाश काबरा, प्रशांत सोनी, संजय देवडा, सुमीत चौधरी, जगजीतराज खुराना, पंकज वर्मा,रमेशचंद बगडीया, इंदरचंद सोनी, धरमचंद बडेरा, हाजी एकबाल, सुभाषचंद्र काबरा, मनोज आखरे, रत्नदीपक सावजी, गजानन कानडे, द्वारकादास झंवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो आहे.