शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

हिंगोलीत जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक व खादयान्न वस्तूवर जीएसटी नसावा, रिटर्न ...

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक व खादयान्न वस्तूवर जीएसटी नसावा, रिटर्न चुकीचे असेल तर ते दुरुस्त करण्याची तरतूद असावी, IGST ऐवजी CGST आणि SGST किंवा CGST आणि SGST ऐवजी IGST भरला गेला असेल तर करदात्याला तो समायोजित करण्याची तरतूद असावी, विविध प्रकारचे लेजर (CGST, IGST, SGST व्याज दंड) ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे, दोन महिने रिटर्न भरले नसले तर व्यावसायिकांचे ई- वे बिल करता येत नाही. त्यामुळे पुरवठादारास विनाकारण त्रास होतो. वसुली आणि पुरवठा संबंधिताच्या अडचणी निर्माण होतात. नवीनच आलेल्या ई - वे बिलाची वैधता २४ तासात १०० किलोमीटर ऐवजी २०० किलोमीटर करण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक अडचणी निर्माण होणार आहेत. सदर बाबतीत सुट्या, बंद, एकाच वाहनातून अनेक जागी खाली होणारा माल या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. जीएसटीचे अधिकाऱ्यांमार्फत कोणतीही पूर्व सूचना अथवा खुलासा करण्याची संधी न देता जीएसटी नोंदणी रद्द करण्याची तरतूद अन्यायकारक आहे. आधार कार्डवर आधारित नवीन नोंदणीसाठी तीन दिवस तर इतरांसाठी सात दिवस अशी कालमर्यादा बदलून ती सात दिवस आणि तीस दिवस करण्यात आलेली आहे. सदरचा बदल अनावश्यक आहे. पुरवठादाराने जीएसटी भरला नाही तर त्याची जबाबदारी खरेदी दारावर येत आहे. ती तरतूद बदलावी, जीएसटी सोबत फूड सेफ्टी कायदा तसेच आयकर कायद्यातील काही तरतुदी प्रामाणिक व्यावसायिकांना अन्यायकारक असून त्यात बदल होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जीएसटीतील अन्यायकारक व किचकट तरतूदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ सहभागी, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांच्या इतर संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनावर माजी आ. गजाननराव घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल, मयूर कयाल, अनिल नैनवाणी, कैलाश काबरा, प्रशांत सोनी, संजय देवडा, सुमीत चौधरी, जगजीतराज खुराना, पंकज वर्मा,रमेशचंद बगडीया, इंदरचंद सोनी, धरमचंद बडेरा, हाजी एकबाल, सुभाषचंद्र काबरा, मनोज आखरे, रत्नदीपक सावजी, गजानन कानडे, द्वारकादास झंवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो आहे.