शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’ लूट थांबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST

हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ...

हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात तरी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करणे गरजेचे झाले आहे.

कोरोना महामारीमुळे २०१९ पासून रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोना महामारी कमी झाल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी ‘डेमो’ रेल्वे गाडी प्रवाशांसाठी सुरू केली. परंतु, या गाडीचे भाडे मात्र एक्सप्रेसचे आहे. त्यामुळे हे भाडे सर्वसाधारण प्रवाशांना परवडणारे नाही. उलट ‘डेमो’ काही स्टेशनला थांबत पण नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. अशावेळी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...

सध्या हिंगोली रेल्वे स्थानकावरून नरखेड ते काचीगुडा, अमरावती ते तिरुपती, कोल्हापूर ते नागपूर, नांदेड ते जम्मूतावी, नांदेड ते गंगानगर, पूर्णा ते अकोला आदी पाच ते सहा जवळपास रेल्वे सुरू आहेत. परंतु, या सर्व रेल्वे गाड्या एक्सप्रेसच आहेत. त्यामुळे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार...

सद्यस्थितीत शासनाने अनलॉक केला तरी रेल्वे विभाग मात्र पॅसेंजर गाडी सुरू करण्याचे नाव घेत नाही. २० किलोमीटरला ३० रुपये असे दुप्पट भाडे देऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. रेल्वे विभागाने याचा विचार करणे गरजेचे आहे.

जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार...

हिंगोली येथून जवळपास पाच एक्सप्रेस गाड्या धावतात. परंतु, एकाही गाडीला सर्वसामान्यांसाठी जनरल डबा नाही. सर्वत्र व्यवहार अनलॉक झालेला असताना अजूनही जनरल डबे ‘लाॅक’च आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये एखादा तरी जनरल डबा जोडावा.

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार..?

पोळा सणानंतर सर्व सण गोळा होऊ लागतात. त्यामुळे सणावाराला शहराच्या ठिकाणी खरेदीसाठी जावे लागते. अशावेळी खासगी वाहनचालकही दुप्पट भाडे घेत आहेत. प्रवास करावा की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.

-गजानन वडाणकर, प्रवासी

रेल्वे विभाग पॅसेंजर गाड्याही सुरू करत नाही आणि एक्सप्रेस रेल्वेला जनरल डबाही जोडत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी प्रवास करावा की नाही, हे कळायला मार्ग नाही. रेल्वे विभागाने प्रवाशांची काळजी घेऊन जनरल डब्बा जोडावा.

-बालासाहेब कल्याणकर, प्रवासी

डमी ११४२