शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’ लूट थांबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST

हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ...

हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात तरी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करणे गरजेचे झाले आहे.

कोरोना महामारीमुळे २०१९ पासून रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोना महामारी कमी झाल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी ‘डेमो’ रेल्वे गाडी प्रवाशांसाठी सुरू केली. परंतु, या गाडीचे भाडे मात्र एक्सप्रेसचे आहे. त्यामुळे हे भाडे सर्वसाधारण प्रवाशांना परवडणारे नाही. उलट ‘डेमो’ काही स्टेशनला थांबत पण नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. अशावेळी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...

सध्या हिंगोली रेल्वे स्थानकावरून नरखेड ते काचीगुडा, अमरावती ते तिरुपती, कोल्हापूर ते नागपूर, नांदेड ते जम्मूतावी, नांदेड ते गंगानगर, पूर्णा ते अकोला आदी पाच ते सहा जवळपास रेल्वे सुरू आहेत. परंतु, या सर्व रेल्वे गाड्या एक्सप्रेसच आहेत. त्यामुळे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार...

सद्यस्थितीत शासनाने अनलॉक केला तरी रेल्वे विभाग मात्र पॅसेंजर गाडी सुरू करण्याचे नाव घेत नाही. २० किलोमीटरला ३० रुपये असे दुप्पट भाडे देऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. रेल्वे विभागाने याचा विचार करणे गरजेचे आहे.

जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार...

हिंगोली येथून जवळपास पाच एक्सप्रेस गाड्या धावतात. परंतु, एकाही गाडीला सर्वसामान्यांसाठी जनरल डबा नाही. सर्वत्र व्यवहार अनलॉक झालेला असताना अजूनही जनरल डबे ‘लाॅक’च आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये एखादा तरी जनरल डबा जोडावा.

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार..?

पोळा सणानंतर सर्व सण गोळा होऊ लागतात. त्यामुळे सणावाराला शहराच्या ठिकाणी खरेदीसाठी जावे लागते. अशावेळी खासगी वाहनचालकही दुप्पट भाडे घेत आहेत. प्रवास करावा की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.

-गजानन वडाणकर, प्रवासी

रेल्वे विभाग पॅसेंजर गाड्याही सुरू करत नाही आणि एक्सप्रेस रेल्वेला जनरल डबाही जोडत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी प्रवास करावा की नाही, हे कळायला मार्ग नाही. रेल्वे विभागाने प्रवाशांची काळजी घेऊन जनरल डब्बा जोडावा.

-बालासाहेब कल्याणकर, प्रवासी

डमी ११४२