शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

विद्युत रोहित्रासाठी रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:09 IST

वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआडगाव रंजे : वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.बोरी सावंत गावातील गावठाणचे दोन रोहित्र गत दोन महिन्यांपासून जळाल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. गावातील नवीन रोहित्राचे कामे अपूर्ण झाले आहे. त्याबरोबरच सौभाग्य योजनेत मीटर बसविणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आदी मागण्यांसंबंधी ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदने देऊनही समस्या सुटत नव्हती. त्यामुळे गावकरी मंडळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोलीचे उपकार्यकारी अभियंता अब्दुल जब्बार, वसमतचे वरिष्ठ अभियंता एस.एस. कादरी तसेच हट्ट्याचे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी आंदोलनस्थळी येऊन रोहित्र बसवण्याबरोबरच इतर मागण्या पूर्ण केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामध्ये गावातील एका गावठाण रोहित्राचे काम ओपीडीसी योजनेंतर्गत रखडले होते. ते दोनच दिवसांत पूर्ण केले जाईल, गावातील दोन रोहित्र नादुरुस्त आहेत. आॅईल आल्यानंतर त्या रोहित्रांची दुरुस्ती करुन लवकरात लवकर देण्यात येईल, रोहित्राच्या दुरुस्तीबरोबरच केबल व किटकॅट बॉक्स लवकरच देण्यात येईल, सौभाग्य योजनेची कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, बोरी उपकेंद्रात साहित्य देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात लवकरच पाठवण्यात येईल, हे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले. या लेखी अश्वासनावर सरपंचासह पंचाच्या स्वाक्षºया आहेत. लगेच एक डी.पी. पाठवून दिला. तसेच शिल्लक कामे लवकर करण्याचे लेखी दिल्यामुळे गामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.यावेळी माणिकराव सावंत, रोहिदासराव सावंत, मदन कºहाळे, भगवानराव सावंत, तुकाराम सावंत, मुरलीधर सावंत, राजू सावंत, मुंजाजी सावंत, दादाराव क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हट्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.ग्रामस्थांनी मागण्यांसाठी अनेकदा महावितरणला निवेदने दिली. त्याला महावितरणच्या अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली, निवेदनांचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळेच मागण्या मान्य करुन घेण्यासाठी बोरी सावंत ग्रामस्थांवर रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलनस्थळी महावितरणचे अधिकारी दाखल झाल्यानंतर अधिकाºयांना घेराव घातला. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. अन्यथा आंदोलनात अनुचित प्रकारही घडला असता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा