शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२१ फेबु्रवारीपासून बारावीच्या परीक्षेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:19 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावी तसेच उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २१ फेबु्रवारीपासून १२ बारावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे. तर १ ते २२ मार्च या कालावधीत दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावी तसेच उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २१ फेबु्रवारीपासून १२ बारावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे. तर १ ते २२ मार्च या कालावधीत दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.हिंगोली जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. २१ फेबु्रवारी ते २० मार्च कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेबु्रवारी, मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेस एकूण १३ हजार २७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील ३४ केंद्रावरून परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये बारावीतील कला शाखेचे ४ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. तर विज्ञान शाखा ७ हजार २३७, वाणिज्य ८९३ तर एमसीव्हीसी ३६१ एकूण १३ हजार २७५ बारावी परीक्षा देतील. दहावी बारावी परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात आहे. तसेच परीक्षा केंद्रावरील बैठे व फिरते पथक याबाबत नियोजन केले जात आहे. बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा ११ ते २ यावेळेत होणार आहे. २१ फेबु्रवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी परीक्षार्थ्यांची संख्या लक्षात घेता ३ परीक्षा केंद्र वाढविण्यात आले आहेत.हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय, जि. प. बहुविध प्रशाला, शिवाजी महाविद्यालय, सरजूदेवी भारूका आर्य कन्या विद्यालय, अमृतराव पाटील विद्यालय माळहिवरा, छत्रपती शाहू.म.उ.मा.वि आडगाव, जि.प. हायस्कूल कनेरगाव नाका, महात्मा ज्योतिबा फुले क.म.वि. कळमनुरी, गुलाब नबी आजाद उर्दू कॉलेज कळमनुरी, श्री शिवराम मोघे ज्यु.महा. कळमनुरी, नारायण वाघ क.म.वि. आखाडा बाळापूर यासह जिल्हाभरातील एकूण ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाºया बारावी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे.जिल्ह्यात दहावी, बारावी परीक्षा कालावधीत कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार असून नियोजन करण्यात आले आहे. याबाबत केंद्र संचालकांना सूचनाही देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी दिली. परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.गतवर्षी १३ विद्यार्थी केले होते रेस्टिकेट...परीक्षा कालवधीत गतवर्षी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी परीक्षेदरम्यान नक्कला करणाºया विद्यार्थ्यांवर कार्यवाही करण्यात आली. परीक्षा कालावधीत एकूण १३ च्या जवळपास विद्यार्थ्यांना रेस्टिकेट करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता दहावीचे ७ तर बारावतील ६ विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त शांततामय वातावरणात परीक्षा द्यावी. परीक्षा कालावधीत कोणी नकला करू नये, असे आवाहन परीक्षा मंडळातर्फे केले जात आहे.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी