शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

२१ फेबु्रवारीपासून बारावीच्या परीक्षेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:19 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावी तसेच उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २१ फेबु्रवारीपासून १२ बारावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे. तर १ ते २२ मार्च या कालावधीत दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावी तसेच उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २१ फेबु्रवारीपासून १२ बारावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे. तर १ ते २२ मार्च या कालावधीत दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.हिंगोली जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. २१ फेबु्रवारी ते २० मार्च कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेबु्रवारी, मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेस एकूण १३ हजार २७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील ३४ केंद्रावरून परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये बारावीतील कला शाखेचे ४ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. तर विज्ञान शाखा ७ हजार २३७, वाणिज्य ८९३ तर एमसीव्हीसी ३६१ एकूण १३ हजार २७५ बारावी परीक्षा देतील. दहावी बारावी परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात आहे. तसेच परीक्षा केंद्रावरील बैठे व फिरते पथक याबाबत नियोजन केले जात आहे. बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा ११ ते २ यावेळेत होणार आहे. २१ फेबु्रवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी परीक्षार्थ्यांची संख्या लक्षात घेता ३ परीक्षा केंद्र वाढविण्यात आले आहेत.हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय, जि. प. बहुविध प्रशाला, शिवाजी महाविद्यालय, सरजूदेवी भारूका आर्य कन्या विद्यालय, अमृतराव पाटील विद्यालय माळहिवरा, छत्रपती शाहू.म.उ.मा.वि आडगाव, जि.प. हायस्कूल कनेरगाव नाका, महात्मा ज्योतिबा फुले क.म.वि. कळमनुरी, गुलाब नबी आजाद उर्दू कॉलेज कळमनुरी, श्री शिवराम मोघे ज्यु.महा. कळमनुरी, नारायण वाघ क.म.वि. आखाडा बाळापूर यासह जिल्हाभरातील एकूण ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाºया बारावी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे.जिल्ह्यात दहावी, बारावी परीक्षा कालावधीत कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार असून नियोजन करण्यात आले आहे. याबाबत केंद्र संचालकांना सूचनाही देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी दिली. परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.गतवर्षी १३ विद्यार्थी केले होते रेस्टिकेट...परीक्षा कालवधीत गतवर्षी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी परीक्षेदरम्यान नक्कला करणाºया विद्यार्थ्यांवर कार्यवाही करण्यात आली. परीक्षा कालावधीत एकूण १३ च्या जवळपास विद्यार्थ्यांना रेस्टिकेट करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता दहावीचे ७ तर बारावतील ६ विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त शांततामय वातावरणात परीक्षा द्यावी. परीक्षा कालावधीत कोणी नकला करू नये, असे आवाहन परीक्षा मंडळातर्फे केले जात आहे.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी