शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मुंबईसाठी जाणारी एसटी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

हिंगोली: मुंबई या मोठ्या शहरासाठी हिंगोली ते मुंबई अशी कोरोनाआधी बस सुरू होती, परंतु गत महिन्याभरापसून ही बस बंदच ...

हिंगोली: मुंबई या मोठ्या शहरासाठी हिंगोली ते मुंबई अशी कोरोनाआधी बस सुरू होती, परंतु गत महिन्याभरापसून ही बस बंदच आहे. त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात १ ते ७ मार्च दरम्यान सर्वच बसेस बंद होत्या. आता २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान बसेस बंद केल्या आहेत. यामुळे एकंदर एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसत आहेत. आधीच एसटी महामंडळाला प्रवासी मिळेना झाले आहेत. त्यात दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले आहे.

बॉक्स

दोन फेऱ्या रोज

कोरोना आधी हिंगोलीवरून मुंबईला जाणारी बस होती. नित्यनेमाने ही बस चालायची. उत्पन्नही चांगले असायचे, परंतु मार्च, २०२० पासून हिंगोली ते मुंबई या बसला कोरोनाची दृष्ट लागली आहे. बस बंद असल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.

बॉक्स

रातराणी एक

हिंगोली मुख्यालयातून हिंगोली ते पुणे ही रातराणी बस आहे. कोरोनाचे रुग्ण परभणी येथे वाढल्यामुळे ही बस सध्या रिसोड मार्गे सोडण्यात येत आहे. या रातराणी बसला पूर्वी चांगले उत्पन्न असायचे, परंतु हल्ली हे उत्पन्न कमी होऊ लागले आहे.

बॉक्स

मुंबईसाठी वेटिंग नाही

कोरोनाआधी मुंबईसाठी वेटिंग राहायचे, परंतु कोरोनामुळे प्रवासी मुंबईसाठी जात नाहीत. त्यामुळे वेटिंगचा प्रश्नच उरत नाही. सहजरीत्या हिंगोली ते मुंबई या गाडीचे रिझर्व्हेशन मिळत आहे.

प्रतिक्रिया

पर जिल्ह्यातील आणि लांब पल्ल्याच्या बसेसला कोरोना आधी चांगले उत्पन्न व्हायचे, परंतु कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे. प्रवासी संख्याही म्हणावी तेवढी मिळत नाही. त्यामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे.

- एस.पी. गोरे, वाहतूक निरीक्षक

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

कोरोना महामारीमुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही प्रवासी खासगी वाहने करून प्रवास करू लागले आहेत. जे काही सूज्ञ ग्राहक आहेत, ते महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात, परंतु कोरोना संसर्गामुळे तेही मागेपुढे पाहू लागले आहेत.

फोटो