हिंगोली: मुंबई या मोठ्या शहरासाठी हिंगोली ते मुंबई अशी कोरोनाआधी बस सुरू होती, परंतु गत महिन्याभरापसून ही बस बंदच आहे. त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात १ ते ७ मार्च दरम्यान सर्वच बसेस बंद होत्या. आता २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान बसेस बंद केल्या आहेत. यामुळे एकंदर एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसत आहेत. आधीच एसटी महामंडळाला प्रवासी मिळेना झाले आहेत. त्यात दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले आहे.
बॉक्स
दोन फेऱ्या रोज
कोरोना आधी हिंगोलीवरून मुंबईला जाणारी बस होती. नित्यनेमाने ही बस चालायची. उत्पन्नही चांगले असायचे, परंतु मार्च, २०२० पासून हिंगोली ते मुंबई या बसला कोरोनाची दृष्ट लागली आहे. बस बंद असल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.
बॉक्स
रातराणी एक
हिंगोली मुख्यालयातून हिंगोली ते पुणे ही रातराणी बस आहे. कोरोनाचे रुग्ण परभणी येथे वाढल्यामुळे ही बस सध्या रिसोड मार्गे सोडण्यात येत आहे. या रातराणी बसला पूर्वी चांगले उत्पन्न असायचे, परंतु हल्ली हे उत्पन्न कमी होऊ लागले आहे.
बॉक्स
मुंबईसाठी वेटिंग नाही
कोरोनाआधी मुंबईसाठी वेटिंग राहायचे, परंतु कोरोनामुळे प्रवासी मुंबईसाठी जात नाहीत. त्यामुळे वेटिंगचा प्रश्नच उरत नाही. सहजरीत्या हिंगोली ते मुंबई या गाडीचे रिझर्व्हेशन मिळत आहे.
प्रतिक्रिया
पर जिल्ह्यातील आणि लांब पल्ल्याच्या बसेसला कोरोना आधी चांगले उत्पन्न व्हायचे, परंतु कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे. प्रवासी संख्याही म्हणावी तेवढी मिळत नाही. त्यामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे.
- एस.पी. गोरे, वाहतूक निरीक्षक
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
कोरोना महामारीमुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही प्रवासी खासगी वाहने करून प्रवास करू लागले आहेत. जे काही सूज्ञ ग्राहक आहेत, ते महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात, परंतु कोरोना संसर्गामुळे तेही मागेपुढे पाहू लागले आहेत.
फोटो