शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

‘एकच मिशन मराठा आरक्षण’ च्या घोषणा देत एसटी बसेस पाठविल्या परत

By रमेश वाबळे | Updated: March 10, 2024 13:12 IST

हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम; मराठा समाजबांधवांनी व्यक्त केला संताप

रमेश वाबळे

हिंगोली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत मराठा समाजबांधवांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकरीता ग्रामीण भागातील लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एसटी बसेस २० ते २५ गावांतून परत पाठविल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ अशा घोषणाही दिल्या.

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर १० मार्च रोजी  दुपारी ३ वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी प्रशासनातील अधिकारी मागील आठवड्यापासून करीत असून, कार्यक्रमास गर्दी जमावी यासाठी विविध योजनांचे लाभार्थी, नागरिकांना आणण्याकरीता महामंडळाच्या हिंगोली जिल्ह्यासह परजिल्ह्यातील आगारांतील ३०० बसेस तसेच खासगी ४०० वाहने ठेवण्यात आली आहेत.

एसटी महामंडळाच्या बसेस ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामीण भागातून नागरिकांना आणण्यासाठी सोडण्यात आल्या. परंतु, मराठा आरक्षणप्रश्नावरून अनेक गावात या बसेसमध्ये कोणीही न बसता रिकाम्या परत पाठविण्यात आल्या.

गुगुळ पिंपरी, चुंचा, आसेगाव, वारंगा फाटा, कृष्णापूर, गिरगाव, पुसेगाव, कुरूंदा, डोंगरकडा, खांडेगाव, उमरा, निशाणा, नर्सी नामदेव, वडद, आंबाळा, कडती, लोहगाव, हानवतखेडा आदी गावातून या बसेस परत पाठविण्यात आल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी संताप व्यक्त केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी आंदोलन केले. मात्र, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाच्या प्रचाराची गाडी येऊ देणार नाही, असा निर्णय घेत तुम्ही गावातून बस बाहेर न्यावी अशी विनंती चालकांना करण्यात आली. त्यामुळे या गावातून लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या बसेस रिकाम्याच आल्या.