शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एकच मिशन मराठा आरक्षण’ च्या घोषणा देत एसटी बसेस पाठविल्या परत

By रमेश वाबळे | Updated: March 10, 2024 13:12 IST

हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम; मराठा समाजबांधवांनी व्यक्त केला संताप

रमेश वाबळे

हिंगोली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत मराठा समाजबांधवांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकरीता ग्रामीण भागातील लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एसटी बसेस २० ते २५ गावांतून परत पाठविल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ अशा घोषणाही दिल्या.

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर १० मार्च रोजी  दुपारी ३ वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी प्रशासनातील अधिकारी मागील आठवड्यापासून करीत असून, कार्यक्रमास गर्दी जमावी यासाठी विविध योजनांचे लाभार्थी, नागरिकांना आणण्याकरीता महामंडळाच्या हिंगोली जिल्ह्यासह परजिल्ह्यातील आगारांतील ३०० बसेस तसेच खासगी ४०० वाहने ठेवण्यात आली आहेत.

एसटी महामंडळाच्या बसेस ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामीण भागातून नागरिकांना आणण्यासाठी सोडण्यात आल्या. परंतु, मराठा आरक्षणप्रश्नावरून अनेक गावात या बसेसमध्ये कोणीही न बसता रिकाम्या परत पाठविण्यात आल्या.

गुगुळ पिंपरी, चुंचा, आसेगाव, वारंगा फाटा, कृष्णापूर, गिरगाव, पुसेगाव, कुरूंदा, डोंगरकडा, खांडेगाव, उमरा, निशाणा, नर्सी नामदेव, वडद, आंबाळा, कडती, लोहगाव, हानवतखेडा आदी गावातून या बसेस परत पाठविण्यात आल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी संताप व्यक्त केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी आंदोलन केले. मात्र, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाच्या प्रचाराची गाडी येऊ देणार नाही, असा निर्णय घेत तुम्ही गावातून बस बाहेर न्यावी अशी विनंती चालकांना करण्यात आली. त्यामुळे या गावातून लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या बसेस रिकाम्याच आल्या.