शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अंतराच्या नियमामुळे विहिरींवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:48 IST

अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या विहिरींपैकी जवळपास पन्नास विहिरी आता दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे या नियमाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. अंतराची ही मर्यादा १५0 फुटावर आणण्याची मागणी कृषी समितीनेही केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या विहिरींपैकी जवळपास पन्नास विहिरी आता दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे या नियमाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. अंतराची ही मर्यादा १५0 फुटावर आणण्याची मागणी कृषी समितीनेही केली आहे.हिंगोली जिल्ह्यात विशेष घटक योजनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी संजीवनी योजनेत २८९ नवीन विहिरी मंजूर झाल्या आहेत. तर ९७ जुन्या विहिरींची दुरुस्ती, ९२ जणांना विद्युत पंप जोडणी, तुषार संच असे इतर लाभ मंजूर झाले आहेत. असे एकूण ४७८ लाभार्थी आहेत. यासाठी १0.१७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर बिरसा मुंडा कृषी संजीवनीत नवीन ५४ विहिरी मंजूर झाल्या आहेत. याशिवाय १९ जणांना विहिरींची दुरुस्ती तेवढ्याच लाभार्थ्यांना विद्युतपंप जोडणी, तुषार संच असे लाभ मिळणार आहेत.या योजनेत आता विहिरीसाठी अडीच लाख व इतर लाभांसाठी जवळपास सत्तर हजारांची रक्कम मिळते. त्यामुळे लाभार्थ्यांचा या योजनेकडे कल वाढलेला आहे. मात्र दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे, असा नियम असल्याने याबाबतच्या तक्रारी होताच लाभार्थ्यांना लाभ देण्यास शासकीय यंत्रणा कच खात आहे. यामध्ये या दोन्ही योजनांतील लाभार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. आधीच अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्यांना ही अंतराची मर्यादा पूर्ण करणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. एकीकडे शासनाने अल्पभूधारक हा निकष ठेवला तर दुसरीकडे अशा शेतकºयांनी अंतराची मर्यादाही पाळायची हे दुटप्पी धोरण झाले आहे. यात बदल करण्याची मागणी कृषी समितीत डॉ.सतीश पाचपुते यांनी केली. त्याला सभापती प्रल्हाद राखोंडे यांनीही पुष्टी देत तसा ठराव घेतला आहे. याचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी डॉ.पाचपुते यांच्यासह माजी जि.प.सदस्य गयबाराव नाईक यांनी अतिरिक्त मुकाअ पी.व्ही.बनसोडे यांचीही भेट घेतली.कृषी समितीमार्फत घेण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे शासनाकडे प्रस्ताव पाठवून अंतराची मर्यादा कमी करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले. तर यात लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून प्रकरण हाताळण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.या दोन्ही योजनांमध्ये अंतराच्या कारणावरून रखडलेल्या विहिरींची संख्या औंढा-७, वसमत १८, हिंगोली ६, सेनगाव ८ अशी असून कळमनुरीची आकडेवारीच उपलब्ध झाली नाही. एकूण सरासरी काढली तर दहा टक्क्यांपेक्षा जास्त विहिरी यामुळे अडचणीत आल्या आहेत. शासनाने यात शिथिलता न दिल्यास प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीही ही कामे करायला तयार नाहीत. त्यामुळे सरळ लाभ रद्दच करावा लागणार असल्याचे चित्र आहे. यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा झाला तर वेळेत काहीतरी निर्णय येईल. मात्र तोपर्यंत इतर कामे सुरू झाली असली तरीही ही कामे सुरूही करता येणार नाहीत.मागासवर्गीय लाभार्थ्यांना स्वत:च्या बळावर विहीर घेणे शक्य नसते. त्यामुळे शासनाच्या योजनेत लाभ मिळणार असल्याचा आनंद त्यांना झाला होता. मात्र नियमामुळे तो जाणार असल्याने औटघटकेचा ठरला. आता काय करायचे? हा गंभीर प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद