शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अंतराच्या नियमामुळे विहिरींवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:48 IST

अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या विहिरींपैकी जवळपास पन्नास विहिरी आता दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे या नियमाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. अंतराची ही मर्यादा १५0 फुटावर आणण्याची मागणी कृषी समितीनेही केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या विहिरींपैकी जवळपास पन्नास विहिरी आता दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे या नियमाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. अंतराची ही मर्यादा १५0 फुटावर आणण्याची मागणी कृषी समितीनेही केली आहे.हिंगोली जिल्ह्यात विशेष घटक योजनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी संजीवनी योजनेत २८९ नवीन विहिरी मंजूर झाल्या आहेत. तर ९७ जुन्या विहिरींची दुरुस्ती, ९२ जणांना विद्युत पंप जोडणी, तुषार संच असे इतर लाभ मंजूर झाले आहेत. असे एकूण ४७८ लाभार्थी आहेत. यासाठी १0.१७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर बिरसा मुंडा कृषी संजीवनीत नवीन ५४ विहिरी मंजूर झाल्या आहेत. याशिवाय १९ जणांना विहिरींची दुरुस्ती तेवढ्याच लाभार्थ्यांना विद्युतपंप जोडणी, तुषार संच असे लाभ मिळणार आहेत.या योजनेत आता विहिरीसाठी अडीच लाख व इतर लाभांसाठी जवळपास सत्तर हजारांची रक्कम मिळते. त्यामुळे लाभार्थ्यांचा या योजनेकडे कल वाढलेला आहे. मात्र दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे, असा नियम असल्याने याबाबतच्या तक्रारी होताच लाभार्थ्यांना लाभ देण्यास शासकीय यंत्रणा कच खात आहे. यामध्ये या दोन्ही योजनांतील लाभार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. आधीच अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्यांना ही अंतराची मर्यादा पूर्ण करणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. एकीकडे शासनाने अल्पभूधारक हा निकष ठेवला तर दुसरीकडे अशा शेतकºयांनी अंतराची मर्यादाही पाळायची हे दुटप्पी धोरण झाले आहे. यात बदल करण्याची मागणी कृषी समितीत डॉ.सतीश पाचपुते यांनी केली. त्याला सभापती प्रल्हाद राखोंडे यांनीही पुष्टी देत तसा ठराव घेतला आहे. याचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी डॉ.पाचपुते यांच्यासह माजी जि.प.सदस्य गयबाराव नाईक यांनी अतिरिक्त मुकाअ पी.व्ही.बनसोडे यांचीही भेट घेतली.कृषी समितीमार्फत घेण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे शासनाकडे प्रस्ताव पाठवून अंतराची मर्यादा कमी करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले. तर यात लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून प्रकरण हाताळण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.या दोन्ही योजनांमध्ये अंतराच्या कारणावरून रखडलेल्या विहिरींची संख्या औंढा-७, वसमत १८, हिंगोली ६, सेनगाव ८ अशी असून कळमनुरीची आकडेवारीच उपलब्ध झाली नाही. एकूण सरासरी काढली तर दहा टक्क्यांपेक्षा जास्त विहिरी यामुळे अडचणीत आल्या आहेत. शासनाने यात शिथिलता न दिल्यास प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीही ही कामे करायला तयार नाहीत. त्यामुळे सरळ लाभ रद्दच करावा लागणार असल्याचे चित्र आहे. यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा झाला तर वेळेत काहीतरी निर्णय येईल. मात्र तोपर्यंत इतर कामे सुरू झाली असली तरीही ही कामे सुरूही करता येणार नाहीत.मागासवर्गीय लाभार्थ्यांना स्वत:च्या बळावर विहीर घेणे शक्य नसते. त्यामुळे शासनाच्या योजनेत लाभ मिळणार असल्याचा आनंद त्यांना झाला होता. मात्र नियमामुळे तो जाणार असल्याने औटघटकेचा ठरला. आता काय करायचे? हा गंभीर प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद