शहरातील घाणीकडे दुर्लक्ष
हिंगोली : शहरातील अकोला महामार्गावर असणाऱ्या शिवाजी नगरातील उड्डाण पुलाखाली मोठी घाण पसरली आहे. याठिकाणी पाणी पाउच, दारुच्या निकाम्या बाटल्यासह अनेक कचरा जमा झाला आहे. हा कचरा साफ करण्यात यावा अशी मागणी परिसरातील अनेक व्यवसायिकांनी केली असून या मागणीकडे अद्यापही संबंधित विभागाने लक्ष दिले नाही.
वाळुचा तुटवडा कायम
सेनगाव : शहरातील अनेक नागरिकांचे घरकुल मंजूर झालेले असून या घराच्या बांधकामासाठी वेळेवर वाळू मिळत नसल्यामुळे अनेक घरकुलधारकांचे घराचे स्वप्न भंगले आहे. लपून छपून होणारी वाळू विक्री ही महागडी असून ही घरकुलधारकांना परवडत नसल्यामुळे वाळू घाटांचा लिलावा व्हावा अशी मागणी वाढली आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडीत
वसमत : तालुक्यातील ग्रामीण भागाचा वीजपुरवठा मागील चार दिवसांपासून वारंवार खंडीत होत आहे. यासाठी गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी अनेक गावांतून होत आहे. तसेच बऱ्याच गावातील रोहीत्र जळाले असल्यामुळे बऱेच गावकरी अंधारातच दिवस काढत आहे. यासााठी हा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.