शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:53 IST

शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात.

ठळक मुद्देदुकानाबाहेर माल ठेवण्यास मनाईपार्किंगची व्यवस्थ करा

हिंगोली : शहरातील वाहतूक काेंडीची समस्या नागरिकांची डाेकेदुखी बनली आहे, या मथळ्याखाली ‘लाेकमत’ने २९ ऑक्टाेबर राेजी बातमी प्रकाशित केली हाेती. या वृत्ताची पाेलीस प्रशासनाने दखल घेतली आहे. ३० ऑक्टाेबर राेजी पाेलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरात फेरफटका मारून प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. 

शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतुकीची काेंडी हाेईल अशा पद्धतीने काेणीही वाहने उभी करू नयेत, असे आवाहन पाेलीस अधीक्षक कलासागर यांनी केले आहे.

यासंदर्भात वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पाेलीस अधीक्षक कलासागर यांनी हिंगाेली शहरातील महात्मा गांधी चाैक, महावीर स्तंभ परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक यासह विविध भागात फेरफटका मारून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील रस्ता रूंदीकरणाचे कामे झाली तरीही शहरातील वाहतूक काेंडीचा प्रश्न अद्याप तसाच आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी हिंगाेली वाहतूक शाखेकडून यापूर्वी अनेकदा कारवाई करण्यात आली, शिवाय रस्त्यालगतचे अतिक्रमणही काढण्यात आले. वर्दळीच्या ठिकाणी  वाहतूक समस्या कायम आहे. आता खुद्द पोलीस अधीक्षकच रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीच्या शिस्तीसाठी नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. हातगाडेधारकांनाही शिस्त लावण्याची गरज आहे.

दुकानदारांनाही दिल्या सूचनाशहरातील मुख्य बाजारपेठेत अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर साहित्य ठेवल्याने पार्किंग थेट रस्त्यावर जाते. त्याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे दुकानाबाहेर साहित्य ठेवू नये, अशा सूचना पोलीस अधीक्षक कलासागर यांनी काही विक्रेत्यांना दिल्या. तर वन वे असून अंमल होत नसल्याने त्यावरही कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीHingoliहिंगोलीHingoli S Pपोलीस अधीक्षक, हिंगोली